Indo-Pakistani War 1971

 

Dainik Gomantak

देश

भारत-पाक युद्धातील व्हाइस अ‍ॅडमिरल एसएच सरमा यांचा 100 व्या वर्षी अखेरचा श्वास

व्हाईस अ‍ॅडमिरलच्या नातेवाईकांनी सांगितले की एसएच सरमा 100 वर्षांचे होते आणि सोमवारी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दैनिक गोमन्तक

1971 मधील भारत-पाक (Indo-Pakistani War 1971) युद्धातील नायकांपैकी एक असलेले व्हाइस अॅडमिरल (Retired) एसएच सरमा यांचे सोमवारी निधन झाले. व्हाईस अॅडमिरलच्या नातेवाईकांनी सांगितले की एसएच सरमा 100 वर्षांचे होते आणि सोमवारी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1971 च्या पाकिस्तानसोबतच्या (Pakistan) युद्धादरम्यान एसएच सरमा ईस्टर्न (Vice Admiral S H Sarma) फ्लीटचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग होते. 1971 च्या या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता आणि या युद्धानंतरच बांगलादेशच्या (Bangladesh) रूपाने एक नवीन राष्ट्र जन्माला आले.

भारतीय नौदल लष्कराच्या (Indian Navy) अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हाइस अॅडमिरल एसएच सरमा यांनी पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (FOC in C) म्हणूनही काम केले आहे. भुवनेश्वर येथील एका खासगी रुग्णालयात सायंकाळी 6.20 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव मंगळवारी त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येईल, जेथे लोक त्यांना श्रद्धांजली वाहतील, असे त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. 5 जानेवारीला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी 1 डिसेंबर रोजी व्हाइस अॅडमिरल एसएच सरमा यांनी त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा केला. नुकतेच ते दिल्लीतील आझादीच्या अमृत महोत्सवातही सहभागी झाले होते. तथापि, नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, सरमा त्याच दिवशी 99 वर्षांचे झाले.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Odisha CM Naveen Patnaik) यांनी ट्विट करून व्हाइस अॅडमिरल एसएच सरमा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि म्हटले की, “ओडिशाचे एक दिग्गज सुपुत्र, व्हाइस अॅडमिरल एसएच सरमा, पीव्हीएसएम यांच्या निधनाबद्दल कळून खूप दुःख झाले. भारतासाठी त्यांनी आघाडीवर अनेक लढाया लढल्या. माझे विचार आणि प्रार्थना शोकाकुल कुटुंब आणि मित्रांसोबत आहेत."

व्हाइस अॅडमिरल सरमा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना, भुवनेश्वरमधील 120 बटालियनच्या स्टेशन मुख्यालयात कॅप्टन संजीव वर्मा (Captain Sanjeev Verma) यांनी एका संदेशात म्हटले आहे की, “ते नेहमीच आमच्यासाठी प्रेरणास्थान होते. पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ या नात्याने, बंगालच्या उपसागरात भारताच्या विजयाची रणनीती तयार करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाला 50 वर्षे पूर्ण झाली. 50 वर्षांपूर्वी 16 डिसेंबर 1971 रोजी संध्याकाळी 4.35 वाजता पाकिस्तानी लष्कराच्या पूर्व कमांडने आत्मसमर्पण केले. लेफ्टनंट जनरल ए के नियाझी त्या संध्याकाळी ढाक्यामध्ये आत्मसमर्पण पत्रावर स्वाक्षरी करत होते आणि त्यांच्याकडे टक लावून पाहत होते तेव्हा ते इस्टर्न कमांडचे कमांडर होते.

जनरल जगजित सिंग अरोरा यांचे चित्र आजही भारतीय इतिहासात संस्मरणीय मानले जाते. दोन्ही देशांदरम्यान केवळ 13 दिवस चाललेल्या या युद्धात पाकिस्तानचा अनेक आघाड्यांवर पराभव झाला. केवळ पूर्वेकडीलच नव्हे, तर पश्चिमेकडील भागातही त्यांचा पराभव झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sacorda: सफर गोव्याची! पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरणारे, कदंबकालीन शिवमंदिराची भक्ती करणारे 'साकोर्डा'

Iranian Warship Attack: श्रीलंकेच्या किनाऱ्यावर इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडी हल्ला, ‘IRIS डेना’ समुद्रात बुडाली; 101 कर्मचारी बेपत्ता, 78 जखमी

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

SCROLL FOR NEXT