Tiger Dainik Gomantak
देश

Uttarakhand: पौड़ीच्या जंगलात वाघाचे भय! 3 दिवसात 2 जणांचा मृत्यू

Uttarakhand: गावकऱ्यांना रणवीर सिंह नेगी यांचे अर्धे खाल्लेले शरीर पाहायला मिळाले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Uttarakhand: उत्तराखंडच्या पौडी जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात एकाच आठवड्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहीती समोर आली आहे. वाघाने यावेळी एका 75 वर्षीय व्यक्तीवर हल्ला केला होता. यानंतर अधिकाऱ्यांनी 25 गावात रात्री कर्फ्यू लावला होता.

डीएम आशिष चौहान यांनी दिलेल्या माहीतीनुसार, 25 गावात रात्री 7 पासून सकाळी 6 पर्यत कर्फ्यू लावला होता. या परिसरातील सर्व शाळा आणि अंगणवाडी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

वन रेंजर महेंद्र सिंह रावत यांनी दिलेल्या माहीतीनुसार, गावकऱ्यांना रणवीर सिंह नेगी यांचे अर्धे खाल्लेले शरीर पाहायला मिळाले होते. रणवीर सिंह नेगी हा कॉर्बेट नॅशनल पार्कजवळ एकटाच राहत होता. शनिवारी त्याचे नातेवाईक त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु रणवीर सिंह नेगी यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.

  • झुडपात मिळाला मृतदेह

नातेवाईकांनी गावकऱ्यांबरोबर संपर्क साधून रणवीर सिंग नेगी यांच्याशी संपर्क होत नसून त्यांच्या घराकडे जाऊन त्यांच्याविषयी माहीती देण्यास सांगितले होते. गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांचे अर्धा मृतदेह झाडीत सापडला आहे. तीन दिवसात घडणारी अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. याआधी 13 एप्रिलला अशी घटना घडली होती.

  • वाघाला आदमखोर घोषित करण्याची मागणी

वन रेंजर रावत म्हटले आहे की, ज्या लोकांना मारण्यात आले आहे, त्यांच्या परिवाराला 4 लाख रुपए देण्यात येणार आहेत. याबरोबरच, कोटद्वार आमदार दिलीप सिंह कुंवरने मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे वाघाला आदमखोर म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT