Crime News  Dainik Gomantak
देश

Tomato आता जीवही घेऊ लागला! आठवड्यात दोन शेतकऱ्यांची हत्या; आंध्र प्रदेशात घडतायेत धक्कादायक घटना

Andhra Pradesh: हा खून कशामुळे झाला याबाबत स्थानिकांमध्ये विविध चर्चा रंगल्या आहेत. त्यातून नवनवीन माहिती पुढे येऊ लागली आहे.

Ashutosh Masgaunde

Andhra Pradesh Crime News: अन्नमय जिल्ह्यात नुकताच आणखी एका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचा मृत्यू झाला, ही गेल्या सात दिवसांतील जिल्ह्यातील दुसरी घटना आहे.

पोलिसांनी सांगितले की, जिल्ह्यातील पेड्डा तिप्पा समुद्र गावातील शेतकरी बटुला मधुकर रेड्डी (२८) हे सोमवारी मध्यरात्री त्यांच्या शेतात पिकाचे राखण करण्यासाठी झोपले असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांचा भोसकून खून केला.

यानंतर टोमॅटो चोरीच्या प्रयत्ननात हा खून झाल्याची शक्यता स्थानिक व्यक्त करत आहेत. तर काही जणांच्या मते हा खून विवाहबाह्य संबंधातून झाला आहे.

सोमवारी सकाळी त्यांच्या शेतातून जाणाऱ्या स्थानिकांनी त्यांचा मृतदेह जमिनीवर चाकूने वार केलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

त्यांनंतर स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना तसेच मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनाही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून, या हत्येमागे विवाहबाह्य संबंध असावेत, असा संशय आहे.

स्थानिक डीएसपी केसप्पा म्हणाले की त्यांनी सुगावा गोळा केला आहे आणि लवकरच आरोपींना पकडू. “आम्ही या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहोत. आम्ही पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहोत,” तो म्हणाला.

13 जुलै रोजी त्याच जिल्ह्यातील मदनपल्ले मंडल अंतर्गत बोदुमल्लादीन्ने गावात 62 वर्षीय टोमॅटो उत्पादक शेतकरी नरेम राजशेखर रेड्डी यांची हत्या करण्यात आली होती.

फक्त टोमॅटो उत्पादकांचीच हत्या होत असल्याने यामागे संशय व्यक्त होत आहे. काही स्थानिक नागरिक आणि टोमॅटो उत्पादकांच्या मते, सध्या बाजारात टोमॅटोच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे पीकाच्या चोऱ्याही होत आहेत. चारीच्या प्रयत्नातही हा खून झाल्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT