Crime  Dainik Gomantak
देश

कोर्टातच केली चोरी; लॅपटॉप, आयपॅड आणि तीन मोबाईल केले लंपास

पोलिस दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत.

दैनिक गोमन्तक

आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील कोर्टातच चोरी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी एक बॅग चोरली. बॅगेत लॅपटॉप, आयपॅड आणि तीन मोबाईल होते. या लॅपटॉप, आयपॅड आणि सेल फोनमध्ये कृषिमंत्री काकाणी गोवर्धन यांच्याविरुद्ध मानहानीच्या खटल्याचे पुरावे होते. (Theft in court in Andhra Pradesh)

दोन आरोपींची चौकशी
याप्रकरणी 13 एप्रिल रोजी तक्रार दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले. पोलिस दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. चोरट्यांनी रिकामी बॅग न्यायालयाजवळ फेकून दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लवकरच मुख्य आरोपींनाही जेरबंद करण्यात येईल, असे ते म्हणाले.

2016 पासून खटला सुरू आहे
गोवर्धन रेड्डी यांनी यापूर्वी तत्कालीन टीडीपी मंत्री सोमिरेड्डी चंद्रमोहन रेड्डी यांच्यावर एक हजार कोटी रुपयांहून अधिक संपत्ती निर्माण केल्याचा आरोप केला होता. यानंतर 2016 मध्ये सोमिरेड्डी चंद्रमोहन रेड्डी यांनी गोवर्धन रेड्डी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. हाच खटला न्यायालयात प्रलंबित होता, मात्र सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर केवळ तीन दिवसांतच 10 एप्रिल रोजी त्यांच्याविरोधातील पुरावे न्यायालयातून (Court) चोरीला गेले. चोरीला गेलेल्या बॅगमध्ये गोवर्धन रेड्डी यांच्या विरोधात पुरावे असल्याची पुष्टी एका अधिकाऱ्याने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT