Drug Case Dainik Gomantak
देश

Drugs Case: भारतात अमलीपदार्थ जप्तीचे प्रमाण वाढले

संयुक्त राष्ट्रांचा अहवाल : तस्करीचे प्रमाणसुद्धा वाढल्याबाबत चिंता व्यक्त

गोमन्तक डिजिटल टीम

Drugs Case सागरी मार्गाने आणि डार्कनेटच्या माध्यमातून तस्करी वाढली असताना भारतात गत पाच वर्षांत अंमलीपदार्थ जप्तीचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय अमलीपदार्थ नियंत्रण मंडळाने नोंदविले आहे.

तसेच, अंमलीपदार्थांचे उत्पादन रोखण्यासाठी भारताने केलेल्या नियमांचीही दखल ‘आयएनसीबी’ने घेतली.‘आयएनसीबी’ने 2022 या वर्षासाठीचा आपला अहवाल आज सादर केला. या अहवालानुसार, जगभरात सागरी मार्गाने अंमलीपदार्थांची तस्करी करण्याचे प्रमाण वाढले आहे.

मनोविकाराला कारणीभूत ठरणाऱ्या अमलीपदार्थांच्या एकूण उत्पादनापैकी ८० टक्के उत्पादन पाच देशांमध्येच होते. त्यापैकी सर्वाधिक २४ टक्के उत्पादन भारतात होते, तर त्यानंतर चीन (२१ टक्के), अमेरिका (१८ टक्के), इटली (११ टक्के) आणि जर्मनी (७ टक्के) या देशांचा क्रमांक लागतो.

िंथेटिक ड्रग्जची वाढती मागणी : जगभरात फार्मास्युटिकल ओपिऑइड्‌स, बेकायदा पद्धतीने उत्पादन केलेले मेथांम्फेटॅमिन, एमडीएमए, किटामाइन यासारख्या सिंथेटिक ड्रग्जची मागणी वाढत आहे. या अंमलीपदार्थांचे बेकायदा उत्पादन करून त्यांचा जगभरात प्रसार करण्याचा तस्करांचा डाव असल्याचे अहवालात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Film On Ram Temple: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Goa News Live Updates: पिसुर्ले कुंभारखण येथे दीड किलो गांजासह एकाला अटक, वाळपई पोलिसांची कारवाई

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

Vasco Khariwada: खारीवाडा येथे घाऊक मासळी विक्री ठप्प! ग्राहकांत नाराजी; मार्केटातील विक्रेते आक्रमक, पोलिस तैनात

Goa Accidental Death: 192 दिवसांत 143 मृत्‍यू! गोव्यात नेमकं चाललंय काय? 45% बळी युवावर्गाचे

SCROLL FOR NEXT