Night curfew Dainik Gomantak
देश

कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय; बेळगावसह 'या' जिल्ह्यातील हटवला नाईट कर्फ्यू

कोडगू, हसन, दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्हे वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील रात्रीच्या संचारबंदीमध्ये काहीशी शिथिलता आणली आहे.

दैनिक गोमन्तक

देशात कोरोनाचं (Covid 19) सावट काही प्रमाणात कमी झाल्यामुळे केंद्र सरकारबरोबर (Central Government) राज्य सरकारने निर्बंध हटवू लागली आहेत. मात्र कोरोनाचा धोका अद्यापही आहेच. यातच आता खबरदारीचा उपाय म्हणून देशातील अनेक राज्यांनी रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र कर्नाटक राज्याने (State of Karnataka) संचारबंदी (Night curfew) लागू करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. कोडगू, हसन, दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्हे वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील रात्रीच्या संचारबंदीमध्ये काहीशी शिथिलता आणली आहे. कोडगू आणि दक्षिण कन्नड हे जिल्हे शेजारी असणाऱ्या केरळ राज्याला लागून आहेत.

देशात कोरोना संसर्गाची स्थिती काय आहे?

देशभरात कोरोनाची 36,083 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्याचवेळी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, 37,927 लोक या प्राणघातक आजारातून बरे झाले आहेत आणि गेल्या 24 तासांमध्ये 493 मृत्यूंची नोंद झाली आहे. ताज्या प्रकरणांमध्ये, संसर्गाचा दर 1.73 टक्के नोंदवला गेला. त्याच वेळी, देशभरात सक्रिय प्रकरणे (Active Case) म्हणजे उपचार घेत असलेल्या लोकांची संख्या 3,85,336 वर पोहोचली आहे. लसीकरणाबद्दल बोलताना, भारतात कोरोना विषाणूविरूद्ध लसीकरणांची संख्या 54,38,46,290 पार केली आहे. अहवालानुसार, 24 तासात 73,50,553 लोकांना लस देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT