Sharad Pawar Dainik Gomantak
देश

Lakhimpur Kheri Violence: सरकारने लोकशाहीचा खून केलाय, शरद पवारांचा घणाघात

दिल्लीच्या सीमेवर कृषी आंदोलनाचा निषेध करण्यासाठी शेतकरी मागील काही महिन्यांपासून आंदोलन करत आहेत.

दैनिक गोमन्तक

दिल्लीच्या सीमेवर कृषी आंदोलनाचा निषेध करण्यासाठी शेतकरी मागील दीड वर्षापासून आंदोलन करत आहेत. मात्र लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांवर जो हल्ला झाला तो निषेधार्य होता असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी योगी आणि मोदी सरकारवर घणाघात केला.

पवार पुढे म्हणाले, ''केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांवर हल्ला करत आहे. यातच लखीमपूर खेरीतील हल्ल्यात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून याची जबाबदारी मोदी सरकार आणि योगी सरकारची आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांवर हल्ला झाला त्याचा मी निषेध करतो. त्याचबरोबर या हल्ल्य़ाची तात्काळ चौकशी सुरु करण्यात यावी. त्याचबरोबर या घटनेच्या निषेधार्थ देशातील शेतकऱ्यांनी एकत्र आले पाहिजे आणि सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे. दुसरीकडे मात्र विरोधकांना लखीमपूरमध्ये जाण्यापासून योगी सरकारकडून रोखण्यात येत आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यामान न्यामूर्तींच्या अध्यक्षतेखाली या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी. देशातील शेतकऱ्यांना आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी जी काही पाऊले उचलण्याची गरज आहे त्यासाठी मी आवश्यक प्रयत्न करणार असल्याचेही ते यावेळी म्हटले. योगी सरकारकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये ज्या प्रकारे देशातील नागरिकांची हत्या ब्रिटीशांनी केली होती त्याप्रमाणे योगी सरकार करत आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT