Sharad Pawar Dainik Gomantak
देश

Lakhimpur Kheri Violence: सरकारने लोकशाहीचा खून केलाय, शरद पवारांचा घणाघात

दिल्लीच्या सीमेवर कृषी आंदोलनाचा निषेध करण्यासाठी शेतकरी मागील काही महिन्यांपासून आंदोलन करत आहेत.

दैनिक गोमन्तक

दिल्लीच्या सीमेवर कृषी आंदोलनाचा निषेध करण्यासाठी शेतकरी मागील दीड वर्षापासून आंदोलन करत आहेत. मात्र लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांवर जो हल्ला झाला तो निषेधार्य होता असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी योगी आणि मोदी सरकारवर घणाघात केला.

पवार पुढे म्हणाले, ''केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांवर हल्ला करत आहे. यातच लखीमपूर खेरीतील हल्ल्यात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून याची जबाबदारी मोदी सरकार आणि योगी सरकारची आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांवर हल्ला झाला त्याचा मी निषेध करतो. त्याचबरोबर या हल्ल्य़ाची तात्काळ चौकशी सुरु करण्यात यावी. त्याचबरोबर या घटनेच्या निषेधार्थ देशातील शेतकऱ्यांनी एकत्र आले पाहिजे आणि सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे. दुसरीकडे मात्र विरोधकांना लखीमपूरमध्ये जाण्यापासून योगी सरकारकडून रोखण्यात येत आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यामान न्यामूर्तींच्या अध्यक्षतेखाली या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी. देशातील शेतकऱ्यांना आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी जी काही पाऊले उचलण्याची गरज आहे त्यासाठी मी आवश्यक प्रयत्न करणार असल्याचेही ते यावेळी म्हटले. योगी सरकारकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये ज्या प्रकारे देशातील नागरिकांची हत्या ब्रिटीशांनी केली होती त्याप्रमाणे योगी सरकार करत आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT