rajasthan jaipur dudu five dead bodies found in well a woman posted whatsapp status before suicide Dainik Gomantak
देश

तीन बहिणींच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणात 5 जणांना अटक, एका बहिणीने मरण्यापूर्वी...

शनिवारी या महिलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

दैनिक गोमन्तक

राजधानी जयपूरजवळील दुडू परिसरात एका विहिरीत 3 महिलांसह 2 मुलांचे मृतदेह सापडल्याप्रकरणी आता एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे. मृतांपैकी एका बहिणीचे व्हॉट्सअॅप स्टेटस आता समोर आले आहे.ज्यामध्ये तिने आधीच आत्महत्या केल्याचे संकेत दिले होते. पीडितेच्या वडिलांच्या अहवालाच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 304बी (हुंडा हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणी तिन्ही बहिणींचे पती, सासू आणि मेहुण्याला अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये मृत कालीचा पती नरसिंग (29 वर्ष), जगदीश (27 वर्ष), मयत ममताचा पती आणि मयत कमलेशचा पती मुकेश (25) यांचा समावेश आहे. याशिवाय पोलिसांनी संतोष (62) आणि तिन्ही बहिणींची सासू ,मीना (32) यांना अटक केली आहे. तिन्ही मृत मुली दुडूपासून 3 किमी अंतरावर असलेल्या छप्या गावातील रहिवासी आहेत. त्यांचे सासर दुडू शहरातील मीनाच्या धानीस होते.

25 मे रोजी दुपारी तीन बहिणी आणि दोन निष्पाप अचानक बेपत्ता झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरूवारी 26 मे रोजी कुटुंबीयांनी दुडू पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची भीती व्यक्त केली होती.मीण वस्तीत राहणाऱ्या तीन महिला बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला.महिला व बालकांच्या शोधासाठी पोस्टरही लावण्यात आले होते, मात्र शनिवारी या महिलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.(rajasthan jaipur dudu five dead bodies found in well a woman posted whatsapp status before suicide)

मृतांमध्ये दोन बहिणी गरोदर होत्या

सर्वात मोठी बहीण काली देवी आणि दोन्ही लहान बहिणी ममता आणि कमलेश गरोदर होत्या. या तिन्ही बहिणींचे लग्न 2005 मध्ये एकाच कुटुंबातील तीन भावांशी लहान वयात झाले होते.तिघांचेही पती शेतीचे काम करतात. सासरच्या मंडळींनी छळ आणि मारहाण केल्याचा आरोप मृत महिलांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्याचवेळी चुलत भाऊ हेमराज मीनाने आरोप केला आहे की, तिचे सासरचे लोक तिच्या तीन बहिणींना बेदम मारहाण करत होते.

'शोषणापेक्षा मरण बरे'

जयपूर (ग्रामीण) पोलीस अधीक्षक मनीष अग्रवाल यांनी माहिती देताना सांगितले की, एका पीडितेने आत्महत्येपूर्वी व्हॉट्सअॅपवर एक स्टेटसही लिहिला होता, ज्यामध्ये आम्ही पाच जणांच्या मृत्यूचे कारण आमचे सासर असल्याचे म्हटले होते. आम्हाला मरायचे नाही, पण त्यांच्या शोषणापेक्षा आमचे मरण बरे. या सगळ्यात आमच्या आई-वडिलांचा काहीही दोष नाही.'' याशिवाय पोलिसांना दिलेल्या एफआयआरमध्ये वडिलांनी म्हटले आहे की, 25 मे रोजी तीन बहिणींमध्ये सर्वात लहान असलेल्या कमलेशने त्यांना फोन करून मारहाण केल्याबद्दल सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa History: 1380 ते 1470 मध्ये संपूर्ण गोव्याची भरभराट झाली; विजयनगरचा प्रतापी सम्राट देवराय

Australian Open 2026: नव्या युगाची नांदी, 'अल्काराज' ठरला टेनिसचा नवा किंग! नोवाक जोकोविचचा पराभव करुन पटकावलं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद VIDEO

Balochistan Violence: दमन आणि अत्याचाराचा पाकड्यांचा इतिहास...! बलुचिस्तानमधील हिंसाचारावरुन चिखलफेक करणाऱ्यांना भारताचं चोख प्रत्युत्तर

Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुध ग्रहाची 'ट्रिपल चाल' पालटणार नशीब! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Illegal Beef Trafficing: चोर्ला घाटात मध्यरात्री थरार! पाच गायींच्या मांसासह दोन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात; 20 वर्षीय तरुणाला बेड्या

SCROLL FOR NEXT