CM Ashok Gehlot Dainik Gomantak
देश

Rajasthan: CM अशोक गेहलोत यांची मोठी घोषणा, नवीन 19 जिल्हे बनणार; जाणून घ्या

CM Ashok Gehlot: मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी विधानसभेत मोठी घोषणा केली असून राज्यात 19 नवीन जिल्हे आणि 3 नवीन विभाग तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

Manish Jadhav

CM Ashok Gehlot: मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी विधानसभेत मोठी घोषणा केली असून राज्यात 19 नवीन जिल्हे आणि 3 नवीन विभाग तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

गेहलोत म्हणाले की, राज्यात काही नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीच्या मागण्या आमच्याकडे आल्या आहेत. या प्रस्तावांची तपासणी करण्यासाठी आम्ही एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. आता आम्हाला अंतिम अहवाल प्राप्त झाला आहे...

आता मी राज्यात नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार, आता या 19 नवीन जिल्ह्यांसह राजस्थान 50 जिल्ह्यांचे राज्य बनले आहे.

हे 19 नवीन जिल्हे आहेत

अनुपगड (श्रीगंगानगर)

बालोत्रा ​​(बाडमेर)

ब्यावर (अजमेर)

डीग (भरतपूर)

डिडवाना-कुचामानसिटी (नागौर)

दुदु (जयपूर)

गंगापूर शहर (सवाईमाधोपूर)

जयपूर-उत्तर

जयपूर-दक्षिण

जोधपूर पूर्व

जोधपूर पश्चिम

केकडी (अजमेर)

कोटपूतली-बेहरोड (जयपूर)

खैरथल (अलवर)

नीम का स्टेशन (सीकर)

फलोदी (जोधपूर)

सलूंबर (उदयपूर)

सांचोर (जालोर)

शाहपुरा (भिलवाडा)

याशिवाय, बांसवाडा, पाली, सीकर हे नवीन विभाग तयार करण्यात आले आहेत. आता राजस्थानमध्ये एकूण 50 नवीन जिल्हे आणि 10 विभाग आहेत. अर्थसंकल्पावरील (Budget) चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी या सर्व घोषणा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Final: आरसीबीने रचला इतिहास! गुजरातचा धुव्वा उडवत दुसऱ्यांदा कोरलं 'आयपीएल' ट्रॉफीवर नाव, किंग कोहलीचा 'विराट' शो!

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

Stray Cattles: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव कायम, अपघातांचा धोका; दोन वर्षांत 15 गुरांचे बळी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ अव्वल दहातून बाहेर! 3 महिन्यांत 3.21 लाख प्रवासी कमी; विमान वाहतुकीत मंदीचे संकेत

वीरेश बोरकर यांची वाढती लोकप्रियता मनोज परब यांना खुपली? 'रिव्होल्युशनरी गोवन्स' पक्षाच्या चिंधड्या उडण्यामागचं खरं कारण काय?

SCROLL FOR NEXT