Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

ताबडतोब टाकी भरुन घ्या, 'इलेक्शन ऑफर' संपत चाललीयं

विधानसभा निवडणुकीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर न वाढवल्याबद्दल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

दैनिक गोमन्तक

विधानसभा निवडणुकीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर न वाढवल्याबद्दल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शनिवारी ट्विट करत म्हटले की, 'जनतेने त्यांच्या गाडीची टाकी भरुन घ्यावी, कारण मोदी सरकारची 'इलेक्शन ऑफर' लवकरच संपणार आहे.' उत्तर प्रदेशसह (Uttar Pradesh) पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे (Assembly Elections) पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गेल्या काही आठवड्यांपासून वाढलेल्या नसून निवडणुका संपल्यानंतर त्या वाढतील, असा दावा काँग्रेसने केला आहे. सध्या कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवल्यास लिटरमागे 10 ते 12 रुपयांनी वाढ होऊ शकते, असेही अनेक अहवालांमधून सांगण्यात आले आहे. (Rahul Gandhi has criticized the central government)

दरम्यान, ICICI सिक्युरिटीजने अहवालात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती दोन महिन्यांत वाढल्यामुळे, तेल कंपन्यांना खर्चाची पूर्तता करण्यासाठी 16 मार्च 2022 रोजी किंवा त्यापूर्वी इंधनाच्या किमती 12.1 प्रति लिटरने वाढवाव्या लागतील. तेल कंपन्यांच्या मार्जिनचाही विचार केल्यास लिटरमागे 15.1 रुपये दरवाढ करावी लागू शकते. गुरुवारी आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल 120 डॉलरचा टप्पा ओलांडला होता, जो गेल्या नऊ वर्षांतील सर्वोच्च आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT