Rahul Gandhi Criticized Central Government  Dainik Gomantak
देश

'मुझ में भी थोडी काश्मिरीयत है'; श्रीनगरमधुन राहुल गांधींचे वक्तव्य

काश्मीरचा मुद्दा संसदेत मांडायचा होता पण मला बोलण्याची संधी दिली नाही, असे म्हणत राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केंद्र सरकारवर निशाना साधला.

दैनिक गोमन्तक

2019 मध्ये जम्मू -काश्मीरचा (Jammu and Kashmir) विशेष दर्जा संपल्यानंतर प्रथमच श्रीनगरमध्ये आलेले कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जम्मू -काश्मीर राज्याचा दर्जा बहाल करण्याची आणि मुक्त आणि निष्पक्ष विधानसभा निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. विरोधकांचा आवाज दडपल्याबद्दलही राहुल यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, जेव्हाही आम्ही पेगासस आणि जम्मू -काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा आमचा आवाज बंद झाला. (Rahul Gandhi criticizes the central government from Srinagar)

काश्मीरच्या लोकांना भावनिक साद घालत जोडत राहुल म्हणाले, 'माझ्यातही थोडी काश्मिरीयत आहे.' राहुल गांधी पुढे म्हणाले, 'गुलाम नबी आझादजींनी मला काश्मीरचा मुद्दा संसदेत मांडण्यास सांगितले होते पण मला तुम्हाला सांगायचे आहे की, आम्हाला त्याबद्दल बोलण्याची परवानगी दिली नाही. पेगासस, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी असे अनेक मुद्दे आहेत जे मला मांडायचे होते पण बोलण्याची संधी दिली गेली नाही.’

यावेळी बोलताना राहुल गांधी पुढे म्हणाले की, 'आज ही परिस्थिती केवळ जम्मू -काश्मीरबद्दल नाही तर सर्व संस्थांबद्दल आहे. न्यायव्यवस्थेप्रमाणेच राज्यसभा आणि लोकसभेवरही हल्ले होत आहेत. मीडिया सत्य उघड करत नाही..त्यांना दडपले जाते आहे, धमक्या दिल्या जाता आहेत. त्यांच्यामध्ये भीती आहे. त्यांना भीती वाटते की, जर त्यांनी वस्तुस्थितीची माहिती दिली तर त्यांना नोकरी गमवावी लागेल. जम्मू आणि काश्मीर सध्या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले गेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

SCROLL FOR NEXT