Rahul Gandhi
Rahul Gandhi  Dainik Gomantak
देश

''सीमेवरील घुसखोरीबाबत पंतप्रधानांचे मौन देशासाठी घातक''

दैनिक गोमन्तक

भारतात चीनच्या वाढत्या घुसखोरीचा मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. भारतीय हद्दीत चीनची वाढती घुसखोरी आणि पंतप्रधानांचे मौन हे देशासाठी घातक असल्याचे गांधी यांनी सांगितले. त्यांनी ट्विट करून पंतप्रधानांना चीनची भीती वाटते, ते जनतेपासून सत्य लपवतात, असे म्हटले आहे.

गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, पंतप्रधानांवर लष्कराचे मनोधैर्य खच्ची करत देशाच्या सुरक्षेशी खेळल्याचा आरोपही केला आहे. तसेच भारतीय हद्दीत चिनी घुसखोरी आणि पंतप्रधान या विषयावर कोणतेही वक्तव्य करत नसल्याने काँग्रेस नेते त्यांच्यावर हल्ले करत आहेत. तसेच सर्व काही माहीत असूनही आपली प्रतिमा वाचवण्यासाठी सरकार गप्प आहे. असा ही टोला त्यांनी लगावला आहे.

LAC जवळ चीनकडून युद्धे यामध्ये हवाई संरक्षण शस्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याची माहितीही मिळाली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात चीनचे एक विमान LAC वर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांच्या पोझिशनच्या अगदी जवळ आले होते. रडारवर चिनी विमाने दिसताच भारतीय हवाई दल सक्रिय झाले. हवाई दलाने ही घुसखोरी मानली आणि चिनी विमाने पाडण्यासाठी आपली क्षेपणास्त्रे सक्रिय केली. मात्र, भारताच्या इशाऱ्यानंतर चीनचे विमान माघारी गेले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lost From Beach: गोव्यात विविध बीचवरुन पाच मुले बेपत्ता; 'दृष्टी'ने घडवली कुटुंबियांशी पुन्हा भेट

Margao Session Court: वेश्याव्यवसायासाठी महिलांची खरेदी आणि पुरवठा केल्याप्रकरणी एकजण दोषी

Vasco News : चिखलीत बिल्डरने अवैधपणे बनवली पार्किंगसाठी जागा

Pernem Rain : वादळी वाऱ्यामुळे पेडणे तालुक्यात पडझड सुरूच

Tihar Jail: तिहार जेल उडवून देण्याची धमकी; पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु

SCROLL FOR NEXT