Leprosy Dainik Gomantak
देश

Leprosy Free India Campaign: कुष्ठरोग आभियानाचा पंतप्रधान मोदींनी केला प्रारंभ

2025 मध्ये देशाला कुष्ठरोगमुक्त करण्याचे पंतप्रधानांचे (Prime Minister Narendra Modi) ध्येय आहे.

दैनिक गोमन्तक

Leprosy Free India Campaign: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असून देश प्रगतीच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे, जिथे आपण कुष्ठरोगापासून (Leprosy) मुक्त होण्याच्या जवळ आहोत. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी कुष्ठरोग मुक्त भारत अभियान सुरु केले आहे. 2025 मध्ये देशाला कुष्ठरोगमुक्त करण्याचे पंतप्रधानांचे ध्येय आहे. या अभियानांतर्गत घरोघरी जाऊन रुग्णांची ओळख पटवणे, बाधितांना मोफत औषधे आणि गरज भासल्यास शस्त्रक्रिया आदी सुविधा शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.

स्वातंत्र्यानंतरच्या नव्या भारतापुढे निरक्षरता हा सर्वात मोठा अडथळा होता, पण तो अल्पावधीतही दूर होऊ शकला नाही. त्यामुळे समाज अनेक कुप्रथांच्या आणि गैरसमजांच्या विळख्यात सापडला होता. एक म्हणजे रोगांवर इलाज नव्हता, दुसरे म्हणजे गैरसमज त्यांना अधिक गुंतागुंतीचे बनवत होते. त्यापैकी एक कुष्ठरोगाचा आजार होता. कुष्ठरोगाचे निदान होणे म्हणजे समाजापासून पूर्णपणे बहिष्कृत होणे. त्याकाळत समाज कुष्ठरोग असणाऱ्या रुग्णाला शापित समजत असे.

नेमकी लक्षणे काय आहेत: बहुतेक लोकांचा असा विश्वास होता की, रुग्णाने मागील जन्मात काहीतरी वाईट कृत्ये केली त्यामुळे देवाने त्याला शिक्षा म्हणून दिली हा रोग झाला आहे. मायकोबॅक्टेरियम लेप्री (Mycobacterium leprae) आणि मायकोबॅक्टेरियम लेप्रोमॅटोसिस (Mycobacterium lepromatosis) या जिवाणूंद्वारे पसरणाऱ्या कुष्ठरोगाचा संसर्ग सुरुवातीला त्वचेवर आणि नंतर डोळे, नाक, हात, पाय इ.

कुष्ठरोग कसा पसरतो: उपचार न केल्यास त्याच्या संसर्गामुळे अवयव कुजतात. कधीकधी या आजारामुळे अपंगत्व देखील येते. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसण्यासाठी पाच ते २० वर्षे लागू शकतात. हा रोग, थेंबांद्वारे पसरतो, संक्रमित व्यक्तीच्या संपर्काद्वारे प्रसारित केला जाऊ शकतो. स्वातंत्र्यानंतर, 1954-55 मध्ये, त्याच्या प्रतिबंधासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम सुरू करण्यात आला. याआधी देशात या आजारावर औषध नव्हते किंवा लोकांना याबद्दल फारशी माहिती नव्हती.

एमडीटी (मल्टी-ड्रग थेरपी) आल्याने हा आजार नियंत्रणात येऊ लागला. यासोबतच आरोग्य मंत्रालयाने सेलिब्रिटी आणि व्यक्तिमत्त्वांच्या माध्यमातून याला दूर करण्यासाठी मोहिमा सुरु केल्या, ज्या या आजाराचा वेग रोखण्यासाठी खूप प्रभावी ठरल्या. यातून समाजात एक संदेश गेला की हा खरं तर बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होणारा आजार आहे. ते कसे टाळावे आणि त्याची लक्षणे काय आहेत. यामुळे कुष्ठरोगावरही नियंत्रण आले आणि त्याच्या संसर्गात रुग्णाचा कोणताही दोष नाही याची लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पत्रिका वाटल्या, पाहुणे जमले... लग्नाच्या दिवशीच दोन शिक्षिका बहिणींनी संपवलं जीवन, लग्नाचं घर झालं स्मशान; जोधपूरमधील धक्कादायक घटना

Borim Accident: दुर्दैवी घटना! विचित्र अपघातात बोरीतील तरुण ठार; गोव्यातील अपघाती मृत्यूंचे सत्र सुरूच

VIDEO: "सूर्या अती करतो...!", विराटनंतर मांजरेकरांच्या निशाण्यावर भारतीय कर्णधार, संथ खेळीवरुन साधला निशाणा; व्हिडिओ व्हायरल

ईराणचा युरोपला दे धक्का! युरोपियन युनियनच्या नौदल अन् हवाई दलाला केलं 'दहशतवादी' घोषित; आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ

Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! 5149 जागा भरणार; कसा करायचा अर्ज? वाचा..

SCROLL FOR NEXT