Pakistan Attack Warning Dainik Gomantak
देश

India Pakistan Conflict: "पाकिस्तान पहलगामसारखा आणखी एक हल्ला करू शकतो", लेफ्टनंट जनरल मनोज कटियार यांचा इशारा; भारत प्रत्युत्तर देण्यास सज्ज

पाकिस्तान पुन्हा एकदा २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यासारखा हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतो.

Sameer Amunekar

नवी दिल्ली: पश्चिम लष्कराचे कमांडर, लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार यांनी मंगळवारी इशारा दिला की, पाकिस्तान पुन्हा एकदा २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यासारखा हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतो. पहलगाम हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि तो देशासाठी मोठा धक्का ठरला होता.

कटियार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, “पाकिस्तान पहलगामसारखा आणखी एक हल्ला करू शकतो, आम्ही त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतो. सीमेपलीकडून कोणत्याही नव्या दहशतवादी प्रयत्नांना भारताकडून ‘कडा प्रतिसाद’ मिळेल आणि भारतीय सैन्याची तयारी पूर्ण आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पहलगाम हल्ल्यानंतर सुरू करण्यात आलेले 'ऑपरेशन सिंदूर' हे भारताच्या सशस्त्र दलांचे मोठे दहशतवादविरोधी अभियान आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश घुसखोर दहशतवादी गटांना निष्क्रिय करणे आणि नियंत्रण रेषेपलीकडे त्यांच्या लाँच पॅड्सना नष्ट करणे असा आहे.

कटियार म्हणाले की या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानला योग्य उत्तर देण्यात आले आहे, परंतु ही मोहीम अद्याप पूर्णत्वास पोहचलेली नाही आणि आवश्यक ती कारवाई सुरूच ठेवली जाईल.

ते पुढे म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला योग्य उत्तर देण्यात आले होते, परंतु पाकिस्तान कधीही आपले मार्ग बदलू शकत नाही. जर त्यांनी पुन्हा अशा प्रकारच्या कारवाया केल्या तर त्यांना कडक प्रत्युत्तर दिले जाईल.”

या महिन्याच्या सुरुवातीला हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांनीही 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भात काही महत्त्वाचे दावे केले आहेत. त्यांनी सांगितले की या कारवाईत किमान एक डझन पाकिस्तानी लष्करी विमान ज्यात एफ-१६ विमानांचा समावेश आहे.

तसेच भारतीय कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये काही महत्त्वाच्या लष्करी पायाभूत सुविधांना मोठे नुकसानीचे प्रमाण झाले असून त्यात तीन हँगर, किमान चार रडार सुविधा, दोन कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि दोन हवाई तळांवरील धावपट्ट्यांचा समावेश आहे, असं ए.पी. सिंग यांनी सांगितलं होतं.

यापूर्वीही या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतीय लष्कराने जाहीरपणे सांगितलं होते की, सीमेपलीकडून जर पुन्हा दहशतवादी कारवाया केल्या गेल्या तर त्या वेळीही जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल. कटियार यांच्या प्रतिक्रियेतून असे दिसून येते की, सीमावर्ती घटनेविषयीचे धोके अजूनही ताजे आहेत आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत.

कटियार यांनी पत्रकारांशी बोलताना पाकिस्तानला स्वतःच्या स्वार्थासाठी भारताशी संघर्ष कायम ठेवायचा प्रयत्न असल्याचेही सांगितले. त्यांनी म्हटले की याला रोखण्यासाठी आणि नागरिकांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी भारतीय दलांना आवश्यक ती सर्वतोपरी कारवाई करण्याची परवानगी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

IND vs SA 2nd Test: केएल राहुलला टर्न समजलाच नाही, सायमन हार्मरच्या 'अविश्वसनीय' चेंडूवर त्रिफळाचीत! तुम्ही VIDEO पाहिला का?

Smriti Mandhana: 'तिला' स्विमिंगसाठी विचारलं! पलाश मुच्छलचे भलत्याच मुलीसोबत चॅट्स व्हायरल; क्रिकेटर स्मृतीला मोठा धक्का?

Goa News: ५६ व्या IFFI मध्ये विविध राज्यांच्या लोकनृत्यांचे दर्शन; कलाकारांनी मानले आभार

SCROLL FOR NEXT