Mirzapur Uttar Pradesh Accident Dainik Gomantak
देश

VIDEO: अचानक ब्रेक फेल अन्... भीषण अपघातात 11 जण जिवंत जळाले, व्हिडिओ पाहून धक्का बसेल

Mirzapur Uttar Pradesh Accident: मिर्झापूर जिल्ह्यातील ड्रमंडगंज बडका वळणावर हा थरार घडला. वाराणसी-रीवा महामार्गावरील एका धोकादायक वळणावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले.

Sameer Amunekar

मिर्झापूरमधील ड्रमंडगंज घाटात बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास काळाने भीषण झडप घातली. एका भरधाव ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे घडलेल्या या अपघातात ११ जणांचा दुर्दैवी अंत झाला. या अपघाताचे स्वरूप इतके भयानक होते की, धडक लागताच बोलेरो गाडीने पेट घेतला आणि त्यातील नऊ प्रवासी जिवंत जळाले.

घाटातील थरार: ब्रेक फेल झाल्याने अनर्थ

मिर्झापूरमधील ड्रमंडगंज घाटातील 'बड़का घुमान' वळणावर हा अपघात घडला. मध्यप्रदेशातून हरभरा घेऊन येणाऱ्या एका ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाले. उतारावर असल्याने ट्रक अनियंत्रित झाला आणि त्याने समोरून जाणाऱ्या ऑल्टो कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी तीव्र होती की कार दोन्ही ट्रकच्या मध्ये चिरडली गेली. त्यानंतर ट्रकने एका बोलेरोलाही उडवले, ज्यामुळे बोलेरोमध्ये भीषण आग लागली.

मदतीपूर्वीच प्रवाशांचा कोळसा

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत बोलेरोमधील चालकासह सर्व नऊ प्रवाशांचा जिवंत जळून मृत्यू झाला होता. हे सर्व प्रवासी जिगना परिसरातील नरैना गावातील रहिवासी होते. एकाच गावातील इतक्या लोकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश असून त्यांची ओळख पटवण्यात आली आहे.

मृतांची ओळख आणि पोलीस तपास

या भीषण दुर्घटनेत ऑल्टो कारचा चालक जयप्रकाश (२६, रा. सोनभद्र) आणि ट्रकचा खलासी यांचाही ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. पोलीस अधीक्षक अपर्णा रजत कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचा ब्रेक फेल होणे हेच या अपघाताचे मुख्य कारण आहे. बोलेरोमधील मृतांमध्ये बीना सिंह, वंदना, पंकज, पीयूष, सोनम, प्रियंका, शिवा, कार्तिकेय आणि चालक विष्णू सिंह यांचा समावेश आहे. अपघातामुळे वाराणसी-रीवा महामार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती.

सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

ड्रमंडगंज घाटातील धोकादायक वळणे आणि जड वाहनांचे बिघडणारे तांत्रिक आरोग्य यामुळे या परिसरात वारंवार अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या अपघाताने प्रशासकीय यंत्रणेच्या सतर्कतेवर आणि घाटातील वाहतूक नियमांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका तांत्रिक बिघाडाने अनेक हसतीखेळती कुटुंबे उद्ध्वस्त केली असून, मिर्झापूर जिल्ह्यात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बायणात आता वजनावर मिळणार मासे, संयुक्त बैठकीत निर्णय; खारीवाडा येथील पाच विक्रेत्यांची मार्केटमध्ये सोय

कुठे चालला आहे हा सुंदर गोवा?

Shani in Pisces: "आली आली श्रीमंती आली!" शनीच्या कृपेनं 'या' 3 राशींवर होणार धनवर्षाव; नशीब सोन्यासारखं चमकणार

ॲपलचं 'कूक' पर्व संपलं! आता 'हार्डवेअर मॅन' जॉन टर्नस यांच्या हाती यशाची चावी- संपादकीय

Soham Naik: 5व्या प्रकरणात सोहमला अटकेची गरज नाही! लैंगिक अत्‍याचारप्रकरणी क्राईम ब्रँचकडून न्‍यायालयाला निवेदन

SCROLL FOR NEXT