Supreme Court  Dainik Gomantak
देश

Manipur Violence: ''170 मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत'', SC ने व्यक्त केली चिंता

Manipur Violence: मणिपूर हिंसाचारात आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Manish Jadhav

Manipur Violence: मणिपूर हिंसाचारात आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अनेकांच्या मृतदेहांवर अद्यापही अंतिम संस्कारही झालेले नाहीत. मणिपूर हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या 170 मृतदेहांवर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.

चिंता व्यक्त करताना न्यायालयाने सांगितले की, राज्यातील परिस्थिती लक्षात घेता मृतदेह शवागारात पडून राहणे योग्य नाही. या माध्यमातून एकप्रकारे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आपल्या आदेशात म्हटले आहे की, ''ज्या मृतदेहांची ओळख पटली आहे आणि त्यांच्या नातेवाईकांनी दावा केला आहे, त्यांच्या कुटुंबीयांकडून सरकारने ठरवलेल्या 9 ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाऊ शकते. यामध्ये कोणत्याही तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाची गरज नाही. येत्या सोमवारपर्यंत हे अंत्यसंस्कार पूर्ण करावे. सरकार कुटुंबीयांना अंत्यसंस्काराच्या 9 ठिकाणांची माहिती देणार आहे.''

एससीने सांगितले की, ''सोमवारपर्यंत ज्या मृतदेहांची ओळख पटली आहे त्यांच्या कुटुंबीयांना सरकार पुन्हा माहिती देईल. नातेवाईकांनी आठवडाभरात मृतदेह ताब्यात घेतला नाही तर सरकार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करु शकते. ज्या मृतदेहांची ओळख पटली नाही अशा मृतदेहांवर सरकार (Government) अंत्यसंस्कार करु शकते.

मात्र, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी डीएनए नमुने घेणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी आणि एसपी यांनी मृतदेहांवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले जातील याची खात्री करावी.

त्याचबरोबर, कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये. मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांना मृतदेहांची ओळख पटवून त्यांचे अंत्यसंस्कार करता येतील याची सरकार खात्री करेल.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT