Limit Of Two Set For Panchayat Members In Maharashtra Will Only Include Biological Children Not Stepchildren. Dainik Gomantak
देश

पंचायत निवडणुकीत दोन अपत्याचा नियम सावत्र मुलाला लागू होणार नाही : हायकोर्ट

पंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यासाठी दोनपेक्षा जास्ता मुलांच्या जन्माला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीला हा कायदा लागू होतो. यामध्ये सावत्र मुलगा किंवा मुलगी धरून दोनपेक्षा जास्त मुले नसावी अशी तरतूद आहे.

Ashutosh Masgaunde

Limit Of Two Set For Panchayat Members In Maharashtra Will Only Include Biological Children Not Stepchildren: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench), महाराष्ट्रातील पंचायत सदस्यांसाठी निश्चित केलेल्या दोन मुलांच्या मर्यादेत केवळ जैविक मुलांचाच समावेश असेल, सावत्र मुलांचा नाही असा निर्वाळा दिला.

न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने खैरुनिसा शेख चांद यांच्या याचिकेवर सुनावणी करण्याचे निर्देश एकल खंडपीठाला दिले.

जेव्हा पंचायत सदस्य हा पुरुष असतो तेव्हा त्याने किती विवाह केले आहेत हे न बघता तो दोनपेक्षा जास्त मुलांच्या जन्मासाठी जबाबदार असल्यास त्याला अपात्र ठरवले जाईल. त्याचप्रमाणे, सदस्य महिला असताना, तिनेही किती विवाह केले आहेत याचा विचार न करता, किती मुलांना मुलांना जन्म दिला आहे यावरून तिला अपात्र ठरवले जाईल.
न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि वृषाली जोशी

खैरुनिसा यांना दोनपेक्षा जास्त मुले असल्याने त्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले.

महिलेने दावा केला की तिचा पती शेख चांद यांना आधीच्या लग्नापासून दोन मुले होती, परंतु त्यांच्या लग्नातून त्यांना एकच मुलगा आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींमधील 'दोन मुले' हा शब्द सामान्य अर्थाने सावत्र मुलांचा समावेश करण्यासाठी वापरला गेला आहे की मर्यादित अर्थाने फक्त त्यांच्यापुरता आहे हे स्पष्ट करण्यासाठी एकल खंडपीठाने प्रकरण विभागीय खंडपीठाकडे पाठवले.

खंडपीठाने आपल्या आदेशात असे निरीक्षण नोंदवले की, "पुरुष सदस्याच्या संदर्भात 'दोन मुले' या शब्दात त्या व्यक्तीच्या सर्व मुलांचा समावेश असेल ज्यांच्या जन्मासाठी तो जबाबदार आहे, मग ते त्याच्या आधीच्या पत्नीपासून असो की सध्याच्या.

महिला सदस्याच्या बाबतीतही, त्यात त्या महिला सदस्याने जन्म दिलेल्या सर्व मुलांचा समावेश असेल.

या प्रकरणात, ही मुले तिच्या पूर्वीच्या किंवा सध्याच्या विवाहातून जन्माला आली आहेत ही वस्तुस्थिती विचारात घेतली जाणार नाही."

याचिकाकर्त्याचे वकील सुकृत सोहोनी यांनी असा युक्तिवाद केला की, कायद्यानुसार 'दोन मुले' म्हणजे केवळ संबंधित व्यक्तीचे जैविक मूल आणि त्या व्यक्तीच्या सावत्र मुलांचा अपात्रतेसाठी विचार केला जाऊ शकत नाही.

उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) आपल्या आदेशात नमूद केले आहे की, "एखादी व्यक्ती, पुरुष किंवा स्त्री, जर त्यांनी पूर्वीच्या पती किंवा पत्नीपासून आणि सध्याच्या पती किंवा पत्नीपासून दोन पेक्षा मुलांना जन्म दिला असेल तर त्यांना अपात्र ठरवले जाऊ शकते.

न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, "जेव्हा स्त्री सदस्याने दोनपेक्षा जास्त मुलांना जन्म दिला असेल, तेव्हा ती मुले आधीच्या किंवा सध्याच्या विवाहातून जन्माला आली आहेत, हे लक्षात न घेता समान कायदा लागू होईल."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2026: क्रिकेट वर्ल्ड कप शेड्यूल जाहीर, भारत-पाकिस्तान सामन्याबाबत आयसीसीनं घेतला मोठा निर्णय; चाहत्यांची वाढवली उत्सुकता

पंतप्रधानांचे चरणस्पर्श करताच कॅमेऱ्यांनी टिपला क्षण! ऐश्वर्याने घेतले मोदींचे आशीर्वाद; श्री सत्य साईबाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यातील Video Viral

PM Kisan 21st Installment: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता पंतप्रधान मोदींनी केला जारी

Pooja Naik: "ढवळीकर कुटुंबाविरुद्ध जे कारस्थान करतायत, त्यांना...", समर्थकांचे कोटादेवचार देवस्थानात 'गाऱ्हाणे'

IFFI Goa 2025: "इफ्फीपर्यंत पोहोचावं कसं?" हे आहेत उत्तर-दक्षिण गोवा ते पणजीचे काही सोपे मार्ग; जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT