Lack of basic facilities on Ganga Ghat in Varanasi Dainik Gomantak
देश

वाराणसीतील गंगा घाटावर मूलभूत सुविधांचा अभाव; उष्णतेने नागरिक त्रस्त

लोकांना पिण्याच्या पाण्याच्या तुटवडा भासत आहे.

दैनिक गोमन्तक

नेहमी लोकांनी गजबजलेला गंगा घाट ओस पडला आहे. वाराणसीतील तापमान वाढले असून, याचा दुष्परिणाम गंगा घाटावर अवलंबून असलेल्या लोकांच्या व्यवसायावर होत आहे. पिण्याच्या पाण्याच्या तुटवडा भासत आहे. वाराणसीचे तापमान 42.4 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. (Lack of basic facilities on Ganga Ghat in Varanasi)

वाराणसीच्या राजघाटावर पिण्याच्या पाण्याअभावी भाविकांचे हाल होत आहेत. येथील थंड पाण्याचे कुलर बंद स्थितीत आहेत. वाराणसी निषाद कल्याण समितीच्या उपाध्यक्षा दुर्गा साहनी सांगतात की त्यांची कमाई 70 टक्क्यांनी कमी झाली आहे. विक्रमी उष्णतेमुळे प्रवासी येण्यास इच्छुक नाहीत. जे येत आहेत त्यांना पिण्याचे पाणी (Water) मिळत नाही. याकडे महापालिकेने लक्ष द्यावे. गंगा घाटाला भेट देण्यासाठी आलेल्या स्थानिक अनुपम राय यांनी सांगितले की, जूनमध्ये अशी उष्णता पडायची. सध्या तापमान 42.4 अंशांवर पोहोचले आहे. किमान पिण्याच्या पाण्याची आणि तंबूची व्यवस्था तरी महापालिकेने करावी, असे त्यांनी सांगितले.

त्याच वेळी, राजघाटाच्या काठावर पूजा करणारे पांडा पंकज तिवारी यांनी सांगितले की ते गंगा घाटावर पिंड दान करतात. शासन व महापालिकेची यंत्रणा नाही. गंगा घाटावर महिलांसाठी (Women) चेंजिंग रूमही नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; भाजप खासदार काँग्रेस नेते?

'पॉश'च्या अंमलबजावणीत गोवा मागे! न्यायालयाकडून तीव्र नाराजी; अनेक कार्यालयांत अद्याप तक्रार समित्याच नाहीत

मच्छिमारांच्या होड्या मच्छीमार खाते घेणार भाड्याने, किनारी गस्त मजबूत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न; इच्छुकांकडून मागवल्या निविदा

शापोरा नदीमुखाजवळ गाळाचा उपसा कासवांसाठी धोकादायक, काम स्थगित करण्याची वैज्ञानिकांकडून मागणी

Dabolim: दाबोळीतील 'त्या' गाड्यामुळे वाहतुकीला धोका, स्थानिक रहिवाशांत नाराजी; ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याचा दावा

SCROLL FOR NEXT