khalistani terrorist Dainik Gomantak
देश

खलिस्तानी दहशतवादी रिंदानेच नांदेडमध्ये आरडीएक्स पाठवलं

नांदेड आणि आदीलाबादमध्ये मोठा घातपाताचा कट असल्याचं स्पष्ट

दैनिक गोमन्तक

शुक्रवारी हरियाणातील कर्नाल येथे चेक पोस्टवर चार अतिरेक्यांना अटक करण्यात आले होते. या वेळी पोलीसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे, स्फोटके जप्त केली होती. या पार्श्वशभूमीवर पोलीसांनी संशियांची कसून चौकशी केली असता मिळालेल्या माहितीनुसार नांदेड आणि आदीलाबादमध्ये मोठा घातपाताचा कट असल्याचं पोलीसांनी स्पष्ट केलं आहे. (Khalistani terrorist Rinda sent RDX to Nanded )

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंदानंच नांदेडमध्ये आरडीएक्स पाठवलं असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे साधारण 5 ते 6 महिन्यांपूर्वी मुंबईला याबाबत काहीसा सुगावा लागला होता. त्यानुसार, मुंबईत साखली बॉम्बस्फोट घडवून आणलं जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंदानंच नांदेडमधील लोकांकडून जवळपास 200 कोटींची वसुली केली आहे. या पैशांचा उपयोग तो दहशतवादी कारवायांसाठी करणार असल्याचंही सुत्रांनी सांगितलं आहे. सध्या रिंदा पाकिस्तानातील इस्लामाबाद शहरात असून यापूर्वी तो लाहोरमध्ये होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, हरियाणात अटक करण्यात आलेल्या चार अतिरेक्यांचा म्होरक्या हरविंदर सिंग रिंदा याच्या नांदेडमधील साथीदारांच्या घरी धाडसत्र सुरू करण्यात आलं आहे. नांदेड पोलीस दलाचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या आदेशानुसार, संशयितांच्या घरी झडतीची मोहीम राबवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT