Chief Minister Kejriwal Dainik Gomantak
देश

केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, दिल्लीतील शाळा आठवडाभरासाठी बंद !

दिल्लीतील (Delhi) वायू प्रदूषणाबाबत तातडीच्या बैठकीनंतर सांगितले.

दैनिक गोमन्तक

दिल्ली सरकारने शनिवारी वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावर आपत्कालीन बैठक बोलावली, ज्यामध्ये चार प्रमुख निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. बैठकीनंतर केजरीवाल (Chief Minister Kejriwal) म्हणाले की, दिल्लीतील शाळांमधील ऑफलाइन वर्ग आठवडाभर बंद राहणार आहेत. सरकारी कार्यालयेही आठवडाभर बंद राहणार असून कर्मचारी घरुनच काम करतील. लॉकडाऊनबाबत (Lockdown) न्यायालयाच्या सूचनेवर विचार करण्यात आला असून दिल्ली सरकार याबाबत न्यायालयासमोर आपली बाजू मांडणार असल्याचे केजरीवाल म्हणाले.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी सांगितले की, दिल्लीतील शाळा सोमवारपासून पूर्णपणे ऑफलाइन वर्गांसह चालवल्या जातील. सर्व बांधकाम कामे थांबविण्यात येणार आहेत. सरकारी कार्यालयातील कर्मचारी घरुन काम करतील. राष्ट्रीय राजधानीत पसरलेल्या विषारी धुक्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. जवळपास आठवडाभरापासून शहरातील प्रदूषणाची पातळी वाढली आहे. सरकारी कार्यालयेही आठवडाभर बंद राहणार असून कर्मचारी घरुन काम करतील.

दिल्ली आणि एनसीआरमधील सतत वाढत असलेल्या प्रदूषणाच्या पातळीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर काही तासांनी दिल्ली सरकारचा निर्णय आला. दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणाबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने त्यावर ताबडतोब नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, असे म्हटले आहे. यावेळी CJI म्हणाले की, आम्हाला तात्काळ नियंत्रण उपायांची गरज आहे. आवश्यक असल्यास, 2 दिवसांच्या लॉकडाऊनचा किंवा इतर कोणत्याही पर्यायाचा विचार करा. नाहीतर लोक कसे जगतील?

राजकारण आणि सरकारी निर्णयाच्या पुढे जाऊन काम करण्याची गरज आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमना, न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT