देश

'काश्मीरचा विशेष दर्जा परत येणार नाही' ; गुलाम नबी आझाद यांचे रॅलीदरम्यान वक्तव्य

गोमन्तक डिजिटल टीम

काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद, यांनी रविवारी रॅलीदरम्यान एक वक्तव्य केले आहे. जम्मू-काश्मीरला (Jammu Kashmir) विशेष दर्जा देणारे कलम 370, (Article 370) दोन वर्षांपूर्वी रद्द करण्यात आले आहे. काश्मीरचा विशेष दर्जा परत येणार नाही. असे वक्तव्य गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) यांनी केले आहे.

बारामुल्ला येथील एका सभेत गुलाम नबी आझाद बोलत होते. आझाद म्हणाले, 'कलम 370 पुनर्संचयित करता येणार नाही. 370 पुनर्स्थापित करण्यासाठी संसदेत दोन तृतीयांश बहुमत आवश्यक आहे. मी 370 च्या नावाखाली पक्षांना लोकांचे शोषण करू देणार नाही. पण मी लोकांची दिशाभूल करणार नाही. ते परत येऊ शकत नाही.'

स्थानिक पक्षांवर निशाणा साधताना आझाद म्हणाले, 'राजकीय शोषणामुळे काश्मीरमध्ये एक लाख लोकांचा मृत्यू झाला आहे आणि पाच लाख मुले अनाथ झाली आहेत. मी खोटेपणा आणि शोषण यावर मते मागणार नाही. मी फक्त तेच बोलेन जे साध्य होईल, निवडणुकीत मला त्रास झाला तरी चालेल.'

येत्या 10 दिवसात आम्ही नवीन पक्षाची घोषणा करू. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक रहिवाशांना नोकरी, जमीन सुरक्षा यासाठी मला पाठिंबा द्या, असे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi Goa Meeting : लुटारू काँग्रेसचे स्वप्न अपूर्ण ठेवा! पंतप्रधान नरेंद्र मोदी

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आईसाठी 7 वर्षांची मुलगी ठरली 'देवदूत'; सतर्कता दाखवत वाचवला जीव

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT