देश

'काश्मीरचा विशेष दर्जा परत येणार नाही' ; गुलाम नबी आझाद यांचे रॅलीदरम्यान वक्तव्य

गोमन्तक डिजिटल टीम

काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद, यांनी रविवारी रॅलीदरम्यान एक वक्तव्य केले आहे. जम्मू-काश्मीरला (Jammu Kashmir) विशेष दर्जा देणारे कलम 370, (Article 370) दोन वर्षांपूर्वी रद्द करण्यात आले आहे. काश्मीरचा विशेष दर्जा परत येणार नाही. असे वक्तव्य गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) यांनी केले आहे.

बारामुल्ला येथील एका सभेत गुलाम नबी आझाद बोलत होते. आझाद म्हणाले, 'कलम 370 पुनर्संचयित करता येणार नाही. 370 पुनर्स्थापित करण्यासाठी संसदेत दोन तृतीयांश बहुमत आवश्यक आहे. मी 370 च्या नावाखाली पक्षांना लोकांचे शोषण करू देणार नाही. पण मी लोकांची दिशाभूल करणार नाही. ते परत येऊ शकत नाही.'

स्थानिक पक्षांवर निशाणा साधताना आझाद म्हणाले, 'राजकीय शोषणामुळे काश्मीरमध्ये एक लाख लोकांचा मृत्यू झाला आहे आणि पाच लाख मुले अनाथ झाली आहेत. मी खोटेपणा आणि शोषण यावर मते मागणार नाही. मी फक्त तेच बोलेन जे साध्य होईल, निवडणुकीत मला त्रास झाला तरी चालेल.'

येत्या 10 दिवसात आम्ही नवीन पक्षाची घोषणा करू. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक रहिवाशांना नोकरी, जमीन सुरक्षा यासाठी मला पाठिंबा द्या, असे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'भाजप-मगोप युती विरोधकांना क्लिन स्वीप करेल, राज्यात यापुढे तिहेरी इंजिन कार्यरत होईल'! CM सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Amulya Vessel: भारतीय तटरक्षक दलाच्या ‘अमूल्य’चे जलावतरण! किनारपट्टींची सुरक्षा होणार मजबूत, Watch Video

Goa Winter: धुक्यात हरवला गोवा! हुडहुडी वाढली; पुढचे 2 दिवस कसे राहणार हवामान? वाचा..

Goa Politics: खरी कुजबुज; मेस्सी गोव्यात आला असता तर !

Manik Elephant: 'माणिक हत्ती' 1200 किमी प्रवास करून 'वनतारा'त जाऊ शकेल का? गोवा खंडपीठाचे शारीरिक क्षमता तपासण्याचे आदेश Video

SCROLL FOR NEXT