Jaipur Express Firing  Dainik Gomantak
देश

Jaipur Express Firing : जयपूर एक्सप्रेसमध्ये आरपीएफ कॉन्स्टेबलकडून बेछूट गोळीबार; एका पोलिसासह चौघांचा मृत्यू

Ashutosh Masgaunde

Jaipur Express Firing : जयपूरहून मुंबईला येत असलेल्या जयपूर एक्सप्रेसमध्ये सोमवारी सकाळी वापी ते सुरत दरम्यान एका आरपीएफ कॉन्स्टेबलने बेछूट गोळीबार केला. ही घटना ट्रेन क्रमांक 12956 च्या कोच B5 मध्ये सोमवारी पहाटे घडली.

यामध्ये एका रेल्वे पोलिसासह चौघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये काही प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

हल्ला केल्यानंतर कॉन्स्टेबलने धावत्या गाडीतून उडी मारली. या घटनेनंतर जयपूर एक्सप्रेस मीरा-रोड दहिसर येथे थांबवण्यात आली आहे. असे पोलिसांनी सांगितले.

गोळीबार करणारा आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनला पोलिसांनी मीरा रोड येथून अटक केली आहे. त्याने गोळीबार करण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी आरपीएफ कॉन्स्टेबल आणि त्याचा वरिष्ठ एएसआय यांच्यात काही मुद्द्यावरून बाचाबाची आणि वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यानंतर रागाच्या भरात कॉन्स्टेबल चेतनने गोळीबार केला. दहिसर परिसरात पालघर ते मुंबई दरम्यान रेल्वेवर गोळीबार झाला. आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन हा मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईतील डीआरएम नीरज वर्मा यांनी सांगितले की, सकाळी 6 च्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की आरपीएफ जवानाने गोळीबार केला, ज्यामध्ये चार जण ठार झाले. आरोपी एस्कॉर्ट ड्युटीवर तैनात होता.

रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. मृतांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे.

गोळीबाराचे कारण स्पष्ट नाही

पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ म्हणाले की, 'आज मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. एक आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन कुमारने त्याचा सहकारी एएसआय टिकाराम मीणा यांच्यावर गोळीबार केला.

यादरम्यान अन्य तीन प्रवाशांनाही गोळ्या लागल्या. प्राथमिक तपासात आरोपीने आपल्या सर्व्हिसच्या रिव्हॉल्वरने गोळीबार केल्याचे समोर आले आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.'

भरपाईची घोषणा

गोळीबारात मृत्यू झालेल्या RPF ASI टिकाराम मीणा यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा पश्चिम रेल्वेने केली आहे.

पश्चिम रेल्वेने सांगितले आहे की दिवंगत ASI च्या नातेवाईकांना रेल्वे सुरक्षा कल्याण निधीतून 15 लाख रुपये 15 लाख रुपये दिले जातील. याशिवाय मृतांच्या नातेवाईकांना अंतिम संस्कारासाठी 20 हजार रुपये आणि विमा योजनेअंतर्गत 65 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT