Pakistan Attack India 
देश

पाकिस्तानची दोन F-17 भारताने पाडली; पाकचा जम्मू, जैसलमेर आणि पठाणकोट येथे हल्ल्याचा प्रयत्न

Pakistan Attack India: पाकिस्तानने केलेला ड्रोन हल्ला भारताने परतवून लावला असून, एअर डिफेन्स सिस्टिमने हे ड्रोन नष्ट केले आहेत.

Pramod Yadav

नवी दिल्ली: भारताच्या ऑपरेशन संदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने भारतातील विविध ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये ड्रोन पाठविल्यानंतर पाकिस्तानने पाठणकोट, जैसलमेर, अकनूर या ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न भारताने हाणून पाडला आहे. भारताने पाकिस्तानची एफ -१७ ही दोन फायटर जेट खाली पाडली आहेत, अशी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्याने देखील याची कबुली दिली आहे.

पाकिस्तानने चिनी बनावटीच्या एफ -१७ द्वारे भारतात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारताने पाकिस्तानचे फायटर जेट खाली पाडण्यात आले.

पाकिस्तानने सुरुवातीला जम्मू आणि काश्मीरमध्ये ड्रोन पाठवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने सुरक्षा प्रणालीच्या मदतीने (एस-४००) पाकिस्तानचे आठ मिसाईल खाली पाडण्यात आले. पाकिस्तानने सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अरिना सेक्टरमध्ये या मिसाईने हल्ला करण्यात आला होता.

पाकिस्तानी ड्रोन जम्मू आणि काश्मीरमध्ये दिसल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात सायरन वाजवून पूर्ण ब्लॅकआऊट करण्यात आला. भारतात घुसखोरी करणाऱ्या ड्रोनला भारताच्या सुरक्षा प्रणालीने खाली पाडले. याशिवाय पाकिस्तानने राजस्थानमधील जैसलमेर, पंजाबमधील पठाणकोट एअरबेस तसेच, जम्मू विद्यापीठ परिसरात देखील हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. भारताची एअर डिफेन्स सिस्टीम तत्काळ कार्यरत झाले आणि पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT