Indian Army Dainik Gomantak
देश

अशी केली जाईल 'अग्निपथ' योजनेअंतर्गत 'अग्निवीरांची' भरती?

केंद्र सरकारने तीनही सेवांदलांमध्ये तरुणांची भरती करण्यासाठी 'अग्निपथ' योजना आणली आहे.

दैनिक गोमन्तक

केंद्र सरकारने तीन सेवांमध्ये तरुणांची भरती करण्यासाठी 'अग्निपथ' योजना आणली आहे. या योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात भरती करण्यात येणार आहे. अशा तरुणांना 'अग्नवीर' म्हटले जाईल. चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर 25 टक्के तरुणांना सैन्यात कायम केले जाईल. यंदा या योजनेअंतर्गत 46 हजार तरुणांची भरती होणार आहे. (Agnipath Scheme Recruitment)

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, अग्निपथ योजनेमुळे भारतीय तरुणांना सैन्यात सेवा करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे भारताची सुरक्षाही मजबूत होईल. यावर्षी 46 हजार अग्निवीरांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी 17.5 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांना भरती करता येईल. सैन्यात भरतीचे काम ९० दिवसांत सुरू होईल.

पण ही भरती कशी होणार?

केंद्र सरकारने सांगितले की तीन सेवांसाठी नोंदणी ऑनलाइन केंद्रीकृत प्रणालीद्वारे केली जाईल. भरतीसाठी मान्यताप्राप्त तांत्रिक संस्थांमध्ये विशेष रॅली आणि कॅम्पस मुलाखती घेतल्या जातील. यासाठी वयोमर्यादा 17.5 ते 21 वर्षे दरम्यान असेल. सैन्यात भरती होणाऱ्या सर्व तरुणांच्या शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्याही घेतल्या जातील. 10वी आणि 12वी उत्तीर्ण युवक यासाठी अर्ज करू शकतात.

चार वर्षांनी काय?

राजनाथ सिंह म्हणाले की, 4 वर्षांनंतर जेव्हा हे तरुण नागरी कामात जातील, तेव्हा त्यांच्यामध्ये एक शिस्त येईल, जी देशासाठी मोठी संपत्ती ठरेल. चार वर्षांनंतर 75% अग्निवीरांना सेवेतून मुक्त केले जाईल. केवळ 25% तरुण सेवेत राहतील. म्हणजेच 46 हजारांपैकी केवळ साडेअकरा हजार तरुण लष्कराशी जोडले जातील.

आता यासाठी निवड कशी होणार? तर यासाठी तरुणांची चार वर्षांची कामगिरी पाहायला मिळणार आहे. या संदर्भात तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे येणे बाकी असल्याचे सरकारने म्हटले आहे.

सध्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत 10 वर्षांसाठी तरुणांची सैन्यात भरती केली जाते. त्याची मर्यादा 14 वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते.

पगार किती मिळेल?

अग्निवीरांना पहिल्या वर्षी 30 हजार रुपये पगार मिळणार असून त्यापैकी 21 हजार रुपये हातात येतील. दुसऱ्या वर्षी 33 हजार, तिसऱ्या वर्षी 36 हजार 500 आणि चौथ्या वर्षी 40 हजार पगार मिळणार आहे.

सेवेतून मुक्त झाल्यानंतर अग्निवीरांना 'सर्व्हिस फंड पॅकेज' अंतर्गत 11.71 लाख रुपये मिळतील. विशेष म्हणजे यावर कोणताही आयकर लागणार नाही.

केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार या तरुणांना पेन्शन किंवा ग्रॅच्युईटी दिली जाणार नाही. मात्र, अग्निवीरांना चार वर्षांसाठी 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT