haryana 4 children die by drowning in a pond on the day of holi in palwal  Dainik Gomantak
देश

होळीच्या दिवशी तलावात बुडून 4 मुलांचा मृत्यू

मात्र तोपर्यंत झाला चौघांचाही मृत्यू

दैनिक गोमन्तक

हरियाणातील पलवल जिल्ह्यातील भिडुकी गावात होळीच्या दिवशी चार मुलांचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पलवल जिल्ह्यातील भिडुकी गावात असलेल्या सिद्ध दास बाबा मंदिराच्या तलावात होळीच्या दिवशी आंघोळ करताना 4 मुलांचा बुडून मृत्यू झाला. चारही मुले 12 ते 14 वयोगटातील होती. या घटनेनंतर कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

होळी (holi) खेळल्यानंतर चारही मुले या तलावात आंघोळीसाठी गेली असता चौघांचाही खोल पाण्यात बुडून मृत्यू (death) झाल्याचे सांगण्यात येत आहे. आजूबाजूच्या लोकांना माहिती मिळताच गावकऱ्यांनी मुलांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत चौघांचाही मृत्यू झाला होता.

हर्षित (14वर्षे) मुलगा जगदीश, नमन (12वर्षे), मुलगा जगदीश, भोला (13वर्षे) मुलगा मनोज आणि राज मुलगा सुभाष अशी मृत मुलांची नावे आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.

हसनपूर पोलीस (police) ठाण्याचे एसएचओ म्हणाले की, त्यांच्यासोबत आणखी कोणते बालक बुडाले आहे का, याचा पोलीस अद्याप तलावात शोध घेत आहेत. त्यासाठी तलाव रिकामे करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

India GDP Growth: भारताची अर्थव्यवस्था सुस्साट! दुसऱ्या तिमाहीत GDP वाढ 8.2 टक्क्यांनी मजबूत, आर्थिक विश्लेषकांचे चुकले अंदाज

सात राजवंशांनी राज्य केलं, पण संस्कृती टिकली! गोव्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मठांचं कार्य महत्त्वाचं; CM सावंतांचं प्रतिपादन

SCROLL FOR NEXT