Happy Teachers Day 2021: These special things about Dr. Sarvapalli Radhakrishnan Dainik Gomantak
देश

Happy Teachers Day 2021: डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबाबत या खास गोष्टी

दैनिक गोमन्तक

देशभरात शिक्षक दिन (Teachers Day) मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. या दिवशी देशाचे पहिले उपराष्ट्रपती (Vice President) आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला (Dr. Sarvapalli Radhakrishnan). त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 1962 पासून देशभरात शिक्षक दिन साजरा केला जातो.(Happy Teachers Day 2021) लहानपणापासूनच पुस्तकांची आवड असलेले राधाकृष्णन स्वामी विवेकानंदांवर खूपच प्रभावित झाले. त्यांनी स्वामी विवेकानंदांना आपले आदर्श मानले होते. (Happy Teachers Day 2021: These special things about Dr. Sarvapalli Radhakrishnan)

त्यांचा असा विश्वास होता की देशातील सर्वोत्तम मानसिकता असलेले लोकच शिक्षक बनले पाहिजेत. त्यांना शिक्षकांबद्दल खूप आदर होता. आज आम्ही तुम्हाला त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला कदाचित माहित नाहीत.

देशातील महान तत्त्वज्ञ

सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापकही होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. ते मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि नंतर म्हैसूर विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक झाले. त्यांना भारताच्या इतिहासातील महान तत्त्वज्ञ म्हणूनही मानले जाते.

वयाच्या 16 व्या वर्षी लग्न केले

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे वयाच्या 16 व्या वर्षी लग्न झाले. त्यावेळी त्यांच्या पत्नी त्यांच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान होत्या आणि लग्नाच्या वेळी त्या फक्त 10 वर्षांच्या होत्या . त्याच्या पत्नीचे नाव शिवकामू होते. लग्नाच्या पाच वर्षानंतर त्यांच्या घरात मुलगी झाली होती.

देशाचे पहिले उपराष्ट्रपती झाले

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन 1952 मध्ये स्वातंत्र्यानंतर ते देशाचे पहिले उपराष्ट्रपती झाले. उपराष्ट्रपती पदानंतर त्यांनी 1962 मध्ये देशाचे दुसरे राष्ट्रपती म्हणूनही काम केले आहे.

युनेस्को मध्ये प्रतिनिधित्व

भारताच्या स्वातंत्र्यानंतर डॉ सर्वपल्ली राधा कृष्णन यांनी 1949 ते 1952 पर्यंत युनेस्कोमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. यावेळी ते सोव्हिएत युनियनमध्ये भारताचे राजदूतही होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर ते संविधान सभेचे सदस्यही होते.

1954 मध्ये भारतरत्न मिळाले

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांना देशासाठी उत्तम काम केल्याबद्दल 1954 साली देशाचा सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न' प्रदान करण्यात आला. भारतरत्न मिळाल्यानंतरच ते देशाचे राष्ट्रपती झाले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळानंतर ते मद्रासमध्ये गेले.

राधाकृष्णन यांचे दीर्घ आजाराने 17 एप्रिल 1975 रोजी निधन झाले. मार्च1975 मध्ये त्यांना अमेरिकन सरकारने मरणोत्तर 'टेम्पलटन पारितोषिक' प्रदान केले अहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT