Uttar Pradesh Dainik Gomantak
देश

प्रयागराजमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांची निर्घृण हत्या, घरही पेटवले

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज जिल्ह्यातून पाच जणांची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज जिल्ह्यातून पाच जणांची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सर्व लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे. ही घटना प्रयागराजमधील (Prayagraj) तरवाईच्या खैवाजपूर गावातील आहे. जिथे एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. ज्यामध्ये दाम्पत्यासह त्यांची सून आणि 2 वर्षांच्या नातीचा समावेश आहे. सर्वांवर धारदार शस्त्रांनी वार करुन जीवे मारण्यात आले आहे.

दरम्यान, हा गुन्हा केल्यानंतर मारेकऱ्यांनी घरातील एका खोलीला आग लावली. घरातून धूर येत असल्याचे पाहून ही घटना उघडकीस आली. मृतांमध्ये राम कुमार यादव (55), त्यांची पत्नी कुसुम देवी (52), मुलगी मनीषा (25), सून सविता (27) आणि नात मीनाक्षी (2) यांचा समावेश आहे. तर दुसरी नात साक्षी (5) जिवंत सापडली आहे. खून कोणी आणि का केला याबाबत अद्याप मिळालेली नाही.

तसेच, प्रयागराजचे (Prayagraj) डीएम आणि एसएसपी आणि इतर पोलीस अधिकारी तपासात गुंतले आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार या पाच जणांची हत्या करण्यात आली. तरुणीवर बलात्कार झाल्याच्या संशयावर पोलिसांनी (Police) शवविच्छेदनानंतरच संपूर्ण घटनेचा उलगडा होणार असल्याचे सांगितले. याआधी 16 एप्रिलला प्रीती तिवारी (38) आणि तिच्या तीन मुली माही (12), पिहू (8) आणि कुहू (3) यांची प्रयागराजमधील नवाबगंजमधील खगलपूर गावात गळा चिरून हत्या करण्यात आली होती, तर पती राहुल तिवारी (42). लटकलेले आढळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

SCROLL FOR NEXT