Farmers organizations should respond to governments proposal firs 
देश

‘शेतकरी संघटनांनी सरकारच्या प्रस्तावाला पहिल्यांदा प्रतिसाद द्यावा’

गोमंतक वृत्तसेवा

नवी दिल्ली: गेल्या तीन महिन्यांपासून केंद्र सरकारने बनवलेल्य़ा कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटना अंदोलन करत आहेत. कृषी कायद्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात अनेक चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या मात्र अद्याप कोणत्याही प्रकारचा तोडगा निघू शकला नाही. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सरकार पुन्हा चर्चा करण्यासाठी तयार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. तथापि या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांना दीड वर्षासाठी स्थगिती देण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी संयुक्त समिती नेमण्याच्या प्रस्तावाला शेतकरी संघटनांनी पहिल्यांदा प्रतिसाद द्यावा असे तोमर यांनी म्हटले आहे.

कृषी कायद्याच्या विरोधातील शेतकरी संघटनांनचे अंदोलन संपुष्टात यावे यासाठी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात चर्चेच्या 11 फेऱ्या पार पडल्या. शेवटची फेरी 22 जानेवारीला पार पडली होती. मात्र 26 जानेवारीला राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रक्टर रॅली दरम्यान निर्माण झालेल्या हिंसाचाराचा उद्रेक झाल्यानंतर कृषी कायद्यावर तोडगा काढण्यासाठी पुन्हा चर्चेला सुरुवात झाली नाही. ‘’शेतकऱ्यांबाबत मोदी सरकार संवेदनक्षम आहे, आम्ही चर्चेच्या अनेक फेऱ्यांमध्ये सहभागी झालो आहोत, परंतु आमच्या प्रस्तावाला शेतकरी संघटनांनी प्रतिसाद दिलेला नाही,’’ असे तोमर यावेळी म्हणाले. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: आयसीसीने शिकवला धडा! भारताशी पंगा घेणं बांगलादेशला पडलं महाग; वर्ल्ड कपमधून पत्ता कट

Surya Gochar 2026: आत्मविश्वास वाढणार, शत्रू नमणार! फेब्रुवारीत सूर्याचं 'ट्रिपल गोचर', 'या' राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

World Legends Pro T20: क्रिकेटचे 'लीजंड्स' गोव्यात! 6 संघ, 10 दिवस अन् वेर्णाच्या मैदानावर रंगणार टी-20चा थरार

Army Vehicle Accident: जम्मू-काश्मीरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जवान शहीद VIDEO

शिक्षकच आपल्या मुलांना खाजगी शाळेत घालतात तेव्हा... सरकारी शाळांच्या विश्वासार्हतेचे काय?

SCROLL FOR NEXT