Farmers organizations should respond to governments proposal firs 
देश

‘शेतकरी संघटनांनी सरकारच्या प्रस्तावाला पहिल्यांदा प्रतिसाद द्यावा’

गोमंतक वृत्तसेवा

नवी दिल्ली: गेल्या तीन महिन्यांपासून केंद्र सरकारने बनवलेल्य़ा कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटना अंदोलन करत आहेत. कृषी कायद्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात अनेक चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या मात्र अद्याप कोणत्याही प्रकारचा तोडगा निघू शकला नाही. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सरकार पुन्हा चर्चा करण्यासाठी तयार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. तथापि या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांना दीड वर्षासाठी स्थगिती देण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी संयुक्त समिती नेमण्याच्या प्रस्तावाला शेतकरी संघटनांनी पहिल्यांदा प्रतिसाद द्यावा असे तोमर यांनी म्हटले आहे.

कृषी कायद्याच्या विरोधातील शेतकरी संघटनांनचे अंदोलन संपुष्टात यावे यासाठी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात चर्चेच्या 11 फेऱ्या पार पडल्या. शेवटची फेरी 22 जानेवारीला पार पडली होती. मात्र 26 जानेवारीला राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रक्टर रॅली दरम्यान निर्माण झालेल्या हिंसाचाराचा उद्रेक झाल्यानंतर कृषी कायद्यावर तोडगा काढण्यासाठी पुन्हा चर्चेला सुरुवात झाली नाही. ‘’शेतकऱ्यांबाबत मोदी सरकार संवेदनक्षम आहे, आम्ही चर्चेच्या अनेक फेऱ्यांमध्ये सहभागी झालो आहोत, परंतु आमच्या प्रस्तावाला शेतकरी संघटनांनी प्रतिसाद दिलेला नाही,’’ असे तोमर यावेळी म्हणाले. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT