Defence forces RBI PM office most trusted in India  Dainik Gomantak
देश

लष्कर, RBI आणि पंतप्रधान भारतातील सर्वात विश्वासार्ह संस्था: सर्वेक्षण

एका सर्वेक्षणानुसार, संरक्षण दल, आरबीआय आणि भारताचे पंतप्रधान या देशातील तीन सर्वात विश्वासार्ह संस्था आहेत

दैनिक गोमन्तक

एका सर्वेक्षणानुसार, संरक्षण दल, आरबीआय आणि भारताचे पंतप्रधान या देशातील तीन सर्वात विश्वासार्ह संस्था आहेत. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालय चौथ्या स्थानी आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) पाचव्या स्थानावर आहे. किमान दोन तृतीयांश लोकांच्या मताने संरक्षण दलांना प्रथम स्थान देण्यात आले आहे. यानंतर जवळपास 50 टक्के लोकांनी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रिझर्व्ह बँकेवर विश्वास ठेवला आहे.

इप्सॉस इंडियाने केलेल्या या सर्वेक्षणानुसार, 49 टक्के नागरिकांचा विश्वास असलेली संस्था म्हणून भारताचे पंतप्रधान तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर संसद (33 टक्के) सातव्या क्रमांकावर, प्रसार माध्यमे (32 टक्के) आठव्या स्थानावर आणि भारतीय निवडणूक आयोग (31 टक्के) नवव्या स्थानावर आहे.

सर्वेक्षणात म्हटले आहे की, "विश्वासच विश्वासार्हता, नैतिकता आणि आदर आहे. तो अनुकरणीय आणि कमावलेला आहे. हा पाया आहे ज्यावर इतर संस्था बांधल्या जातात. संरक्षण दल, आरबीआय, भारताचे पंतप्रधान हे एक मजबूत पाया असलेले राष्ट्र स्तंभ आहेत. आपल्या ध्येय आणि कार्याने ते लोकांचा सर्वात विश्वासू स्तंभ म्हणून उदयास येत आहे.

सर्वेक्षणात यांना शेवटचे स्थान मिळाले

हे सर्वेक्षण अखंडता आणि चारित्र्याच्या सामर्थ्याबद्दल देखील आहे, ज्यासाठी सर्वात विश्वासार्ह संस्था प्रयत्न करतात. या सर्वेक्षणात राजकारणी (16 टक्के), राजकीय पक्ष (17 टक्के), समुदायाचे नेते (19 टक्के) आणि धार्मिक नेत्यांना (21 टक्के) या यादीत शेवटचे स्थान मिळाले आहे. त्यात म्हटले आहे की, सर्वेक्षण केलेल्या लोकांच्या मते या संस्थांची विश्वासार्हता सर्वात कमी आहे. म्हणून त्यांना शेवटचे स्थान मिळाले आहे.

"या संस्थांवर विश्वास का नाही? आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे? की त्यांचे हेतू सत्यतेच्या कसोटीवर अपयशी ठरत आहेत म्हणून? कारणे काहीही असली तरी, या संस्थांनी काही आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. ते कसे जिंकू शकतात? नागरिकांचा विश्वास कसा संपादन करू शकतात, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे." असेही त्या अहवालात म्हटले आहे.

त्यामुळे अनेकांनी आपले मत मांडले

हे सर्वेक्षण Ipsos India द्वारे संरचित प्रश्नावली वापरून परिमाणात्मक सर्वेक्षणाद्वारे केले गेले होत. त्याद्वारे महिलांसह 2,950 प्रौढांची मते घेण्यात आली. या सर्वेक्षणात चार महानगरे, टियर 1, टियर 2 आणि टियर 3 शहरातील लोकांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुसार हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT