Congress plans to form the government in Bihar
Congress plans to form the government in Bihar 
देश

बिहारमध्ये सत्तास्थापनेसाठी काँग्रेसच्या हालचाली सुरू

गोमन्तक वृत्तसेवा

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणूकीच्या मतदानोत्तर कल चाचणीतून नितीशकुमार सरकारच्या गच्छंतीची चाहूल लागल्याने काँग्रेसमध्ये पुढील रणनितीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी बिहारसाठी सरचिटणीस रणदीप सुरजेवाला आणि अविनाश पांडे यांची निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे.

बिहारमध्ये काल मतदान पूर्ण झाले असून मंगळवारी (ता. १०) मतमोजणी होणार आहे. कालच्या मतदानोत्तर कलचाचणीतून राजद-काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार स्थापन होऊ शकेल, असे संकेत मिळाल्याने काँग्रेस नेतृत्वाचा उत्साह वाढला आहे. बिहारमध्ये पक्षविस्ताराच्या संधीसाठी सत्तेत मानाची भागीदारी आवश्यक असल्याने पुढील तयारीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातूनच निरीक्षक नेमण्याचा निर्णय झाला आहे. 

निवडणूकीदरम्यान बिहारमध्ये ठाण मांडून राहिलेले सरचिटणीस आणि माध्यमविभाग प्रमुख सुरजेवाला आणि उमेदवार छाननी समितीचे प्रमुख असलेले माजी सरचिटणीस अविनाश पांडे यांच्याकडेच निरीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 
एरव्ही निकालानंतर विधीमंडळ पक्षनेता निवडीसाठी नवनिर्वाचित आमदारांचा कल जाणून घेण्यासाठी दिल्लीतून निरीक्षक पाठवण्याची परंपरा राहिली असली तरी आताची परिस्थिती वेगळी असल्याचे काँग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT