EAM S Jaishankar Dainik Gomantak
देश

S Jaishankar: ''टाळी एका हाताने वाजत नाही'', चीन मुद्द्यावरुन जयशंकर स्पष्टच बोलले

External Affairs Minister S Jaishankar: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जगासाठी भारताचे महत्त्व पटवून दिले आहे. जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे.

Manish Jadhav

External Affairs Minister S Jaishankar: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जगासाठी भारताचे महत्त्व पटवून दिले आहे. जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे, कोणत्याही मोठ्या जागतिक मुद्द्यावर भारताशी सल्लामसलत केल्याशिवाय निर्णय होत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. परराष्ट्र मंत्री म्हणाले की, जागतिक मुद्द्यांसाठी भारताची संमती अत्यंत महत्त्वाची आहे. शनिवारी नागपुरात एका कार्यक्रमाला संबोधित करताना जयशंकर म्हणाले की, "जगातील कोणताही मोठा मुद्दा भारताशी सल्लामसलत केल्याशिवाय ठरवला जात नाही. आपण बदललो आहोत आणि जगाची आपल्याबद्दलची धारणा बदलली आहे."

परराष्ट्र मंत्री म्हणाले की, 'आपण स्वतंत्र आहोत, वेगवेगळ्या लोकांशी व्यवहार करुन आपले हित कसे साधायचे हे शिकायला हवे.' जयशंकर यांनी भारत आणि चीन यांच्यातील राजनैतिक संबंधांवरही भाष्य केले. जयशंकर म्हणाले की, दोन्ही बाजूंनी तयारी दाखवल्याशिवाय सीमाप्रश्नावर तोडगा निघणे शक्य नाही.

जयशंकर पुढे म्हणाले की, "मी माझ्या चिनी समकक्षांना समजावून सांगितले आहे की जोपर्यंत तुम्ही सीमा विवादावर तोडगा निघत नाही आणि तोपर्यंत सैन्य सीमेवर तैनात राहतील. पण यामध्ये तुम्ही बाकीचे संबंध सामान्य राहण्याची अपेक्षा करु शकत नाही." परराष्ट्र मंत्री पुढे म्हणाले की, 'दोन्ही देश संबंध सामान्य करण्यासाठी काम करत आहेत आणि काहीवेळा राजनैतिक अडथळे दूर होण्यास वेळ लागतो.'

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी याआधीही याचा पुनरुच्चार केला आहे. गेल्या वर्षी मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जयशंकर म्हणाले होते की, "भारतालाही चीनसोबतचे संबंध सुधारायचे आहेत पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा सीमा भागात शांतता नांदेल.'' सीमावर्ती भागात शांतता नांदत नाही तोपर्यंत दोन्ही देशांमधील संबंध प्रगती करु शकत नाहीत, असे त्यांनी चीनला पूर्णपणे स्पष्ट केले. उत्तरेकडील सीमेवरील परिस्थिती आणि चीनच्या 'बेल्ट अँड रोड' प्रकल्पाविरोधात देशाच्या भूमिकेचा दाखला देत जयशंकर म्हणाले की, भारत कोणत्याही दबाव, लोभ आणि चुकीच्या विमर्शाने प्रभावित नाही.

दरम्यान, 'बेल्ट अँड रोड' प्रकल्प हा चीनने प्रायोजित केलेला प्लॅन आहे, ज्यामध्ये जुन्या सिल्क रोडच्या आधारे आशिया, आफ्रिका आणि युरोपच्या देशांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्याची योजना आहे. भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमधील संघर्षाच्या काही भागात तीन वर्षांहून अधिक काळ तणाव आहे. तथापि, दोन्ही देशांमधील लष्करी आणि राजनैतिक चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर दोन्ही बाजूंनी काही भागात माघार घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT