Bird Flu Dainik Gomantak
देश

Bird Flu Crisis: होळीपूर्वी हाहाकार! झारखंडमध्ये बर्ड फ्लूची दस्तक, सरकारकडून अलर्ट जारी

Bird Flu: गेल्या आठवड्यात बोकारोमध्ये एव्हियन इन्फ्लूएंझा म्हणजेच बर्ड फ्लूमुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली.

Manish Jadhav

Bird Flu Crisis: देशात कोरोनाचं संकट थाबत नसताना होळीपूर्वी रांचीमध्ये बर्ड फ्लूची पुष्टी झाल्यानंतर आरोग्य विभाग आणि पशुसंवर्धन विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे.

केंद्रीय आदिवासी व्यवहार विभागाचे मंत्री अर्जुन मुंडा यांच्या रांची येथील शासकीय निवासस्थानी कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर करण्यात आलेल्या नमुना चाचणीनंतर बर्ड फ्लूचे प्रकरण समोर आले आहे.

मात्र, याआधी गेल्या आठवड्यात बोकारोमध्ये एव्हियन इन्फ्लूएंझा म्हणजेच बर्ड फ्लूमुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली.

दरम्यान, केंद्रीय मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून विहित प्रोटोकॉलनुसार सर्व आवश्यक कार्यवाही सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.

दुसरीकडे, राज्याचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांनी बर्ड फ्लूला (Bird flu) घाबरण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. आवश्यक असल्यास, सावधगिरी बाळगा. पशुसंवर्धन मंत्री परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

अर्जुन मुंडा यांच्या राहत्या घरी कोंबड्या अचानक मरायला लागल्या

रांची येथील जेल मोड जवळ केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्या निवास संकुलात सुरक्षा कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी 55 ते 60 रंगीबेरंगी देसी कोंबड्या पाळल्या होत्या. गेल्या आठवडाभरापासून कोंबड्यांच्या मृत्यूची प्रक्रिया सातत्याने सुरु होती.

एका आठवड्यात 45 हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला, त्यानंतर संशयावरुन, त्यांचे नमुने पशुसंवर्धन विभागाने भोपाळला (Bhopal) तपासणीसाठी पाठवले, जिथे ते बर्ड फ्लू असल्याची पुष्टी झाली.

प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे

येथे, राज्य पशुसंवर्धन संचालक चंदन कुमार यांनी उपायुक्त आणि रांचीचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांना सतर्क केले आहे. संसर्ग टाळण्यासाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना रांचीमधील जेल मोड चौकाच्या एक किमी परिघात कोंबड्यांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच, सर्व कोंबड्या कापण्यासाठी तयार आहेत. एकूण 10 किमी क्षेत्र निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. इकडे रामगड जिल्ह्यातील गिड्डी आणि इतर भागात मोठ्या प्रमाणात कावळे जमिनीवर पडून मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

Iran US Israel War: 12 दिवसांचा भीषण बॉम्बवर्षाव, तरीही इराणची सत्ता अभेद्य! अमेरिकन गुप्तचर अहवालानं उडवली ट्रम्प- नेत्यान्याहूची झोप

Bhausaheb Bandodkar: लोकांना विलीनीकरण नको होते, पण 'भाऊ' हवे होते! जनमत कौलानंतरही टिकून राहिले भाऊसाहेब बांदोडकरांचे वलय

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

SCROLL FOR NEXT