Arvind Kejriwal
Arvind Kejriwal  Dainik Gomantak
देश

हिमाचल प्रदेशमध्ये 'आप'ला मोठा झटका; प्रदेश अध्यक्षच 'भाजप'मध्ये सामील

दैनिक गोमन्तक

हिमाचल प्रदेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. पंजाबमधील विजयानंतर सर्व राज्यांमध्ये पाय पसरू पाहणाऱ्या आम आदमी पक्षाला हिमाचलमध्ये मोठा झटका बसला आहे. आम आदमी पार्टीचे हिमाचल प्रदेश अध्यक्ष अनूप केसरी, संघटन सरचिटणीस सतीश ठाकूर आणि उना अध्यक्ष इक्बाल सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. (Big blow to AAP in Himachal Pradesh)

जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत अनूप केसरी, सतीश ठाकूर आणि इक्बाल सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, हिमाचलची जनता कधीही आपला अपमान सहन करत नाही, म्हणून 'आप'चे (AAP) तिन्ही नेते स्वतःसाठी आणि हिमाचलच्या स्वाभिमानासाठी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. एकीकडे अरविंद केजरीवाल सामान्य माणसाबद्दल बोलतात, पण आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याकडे लक्ष देत नाहीत.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काय म्हणाले अनूप केसरी?
भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर अनूप केसरी म्हणाले, आम्ही आम आदमी पक्षासाठी गेली 8 वर्षे काम करत होतो, मात्र असे असतानाही मंडईतील अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि भगवंत मानजींच्या रॅलीत आमचे कार्यकर्ते 4 तास उन्हात उभे होते. या गोष्टीकडे सर्वजण हिमाचलचा अपमान म्हणून पाहत आहेत आणि सर्व हिमाचलवासी स्वाभिमानी आहेत. आज आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप आम्हाला जी काही जबाबदारी देईल ती आम्ही पार पाडू.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT