Andhra Pradesh Dainik Gomantak
देश

जिल्ह्याच्या नामांतरावरुन संतप्त झालेल्या जमावाने मंत्र्यांच्या घराला लावली आग

आंध्र प्रदेशमध्ये जिल्ह्याच्या नामांतरावरुन संतप्त झालेल्या जमावाने मंत्र्यांच्या घराला आग लावली आहे.

दैनिक गोमन्तक

आंध्र प्रदेशातील अमलापुरम शहरात मंगळवारी दुपारी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर हिंसाचार उसळला. तिथे नव्याने निर्माण झालेल्या कोनसीमा जिल्ह्याचे नाव बदलून बीआर आंबेडकर कोनसीमा जिल्ह्याच्या प्रस्तावाला आंदोलक विरोध करत होते. या हिंसाचारात परिवहन मंत्री पिनिपे विश्वरुपू यांचे घर जाळण्यात आले. पोलिसांनी मंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुखरुप बाहेर काढले.

दरम्यान, आंदोलकांनी पोलिसांचे वाहन आणि एका शैक्षणिक संस्थेची बसही जाळली. त्याचबरोबर आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत अनेक पोलीस (Police) कर्मचारी जखमीही झाले. या घटनेत 20 हून अधिक पोलीस जखमी झाले असल्याचे सांगण्यत येत आहे. आम्ही या घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करु, असे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

तसेच, 4 एप्रिल रोजी तत्कालीन पूर्व गोदावरीतून कोनसीमा जिल्हा तयार करण्यात आला. गेल्या आठवड्यात, राज्य सरकारने कोनसीमाचे नाव बदलून बीआर आंबेडकर कोनसीमा जिल्ह्याचा प्रस्ताव ठेवणारी प्राथमिक अधिसूचना जारी केली होती. यावर काही आक्षेप असल्याने सरकारने (Government) नागरिकांना (Citizens) आमंत्रित केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liberation Day 2025: स्वातंत्र्यसैनिकांनी लढून मुक्त केलेला गोवा आपण कसा राखला पाहिजे, याची किमान जाणीव व्हावी....

Goa Liberation Day 2025: पोर्तुगीज येण्यापूर्वी लोक आदिलशहाच्या सैन्यात भरती होत असत, गोवा मुक्तीसाठी अविरत लढ्याची त्रिस्थळी

माणिकला वाचविण्यासाठी तातडीने पाऊले उचला; 59 वर्षीय हत्तीला उपचारासाठी वनतारामध्ये हलवा, हायकोर्टाची गोवा सरकारला सूचना

भारतीय हवाईदलाच्या विमानांनी 18 डिसेंबरच्या पहाटे दाबोळी विमानतळावर बॉम्बवर्षाव करून 'गोवा मुक्ती मोहिमे'चा शुभारंभ केला..

अग्रलेख: ज्या स्वातंत्र्यासाठी गोमंतकीयांनी रक्त सांडले, त्याच 'गोव्यात' आज मूळ गोमंतकीयांना जगण्यासाठी देश सोडावा लागत आहे..

SCROLL FOR NEXT