Ajit Doval Twitter/ @ANI
देश

'अग्निपथ योजना मागे घेण्याचा प्रश्नच नाही': अजित डोवाल

अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर देशभरात झालेल्या गदारोळानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल चर्चेत आले आहेत.

दैनिक गोमन्तक

Agnipath Scheme Protest: अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर देशभरात झालेल्या गदारोळानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल चर्चेत आले आहेत. त्यांनी अग्निपथ योजना ही काळाची गरज असल्याचे सांगितले आहे. अजित डोवाल यांनी अग्निपथ योजनेसह राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवरही भाष्य केले आहे. वातावरण बदलत असून आता देश सुरक्षित करण्याला प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. योजना मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले. (ajit doval interview on agneepath recruitment scheme by central government)

खरं तर, एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) म्हणाले की, ''भारताभोवतीचे (India) परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. परिस्थितीनुसार रचना बदलावी लागेल. संरक्षण क्षेत्रात प्रत्येक स्तरावर सुधारणा होत आहे. लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी सरकार नवीन शस्त्रे खरेदी करत आहे. आपल्या सैन्याला जागतिक दर्जाचे सैन्य बनवायचे आहे.''

अग्निपथ योजनेवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पुढे म्हणाले की, ''आपण काल जे करत होतो, तेच भविष्यातही करत राहिलो तर सुरक्षित राहू शकणार नाही. उद्याची तयारी करायची असेल तर बदलावे लागेल. योजना आवश्यक आहे, कारण संपूर्ण भारतामध्ये वातावरण बदलत आहे.'' उद्याच्या तयारीसाठी बदल आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. अग्निपथ योजनेची मागणी 22-25 वर्षांपासून प्रलंबित होती.

डोवाल पुढे असेही म्हणाले, ''राजकीय इच्छाशक्तीमुळे हा निर्णय रखडला होता. परंतु आता भविष्याची गरज लक्षात घेऊन मोदी सरकारने निर्णय घेतला आहे. परिस्थितीनुसार रचना बदलावी लागेल. संरक्षण क्षेत्रात प्रत्येक स्तरावर सुधारणा होत आहे. लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी सरकार नवीन शस्त्रे खरेदी करत आहे. आपल्या सैन्याला जागतिक दर्जाचे सैन्य बनवायचे आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

SCROLL FOR NEXT