AIMIM chief Asaduddin Owaisi on Rajnath Singh Savarkar statement Dainik Gomantak
देश

... तर ते सावरकरांना राष्ट्रपिता करतील: असदुद्दीन ओवैसी

असाउद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले, ते इतिहास बदलून सादर करत आहेत.

दैनिक गोमन्तक

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी काल वीर सावरकरांबाबत (Savarkar) केलेल्या वक्तव्यानंतर एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी यावरून टीकास्त्र सोडलं आहे .असाउद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले, ते इतिहास बदलून सादर करत आहेत. हे असेच चालू राहिले तर ते महात्मा गांधींना (Mahatma Gandhi) काढून टाकतील आणि सावरकरांना राष्ट्रपिता बनवतील, ज्यांच्यावर महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप होता आणि न्यायमूर्ती जीवन लाल कपूर यांनी देखील त्यांच्या सावरकर तपासात सहभागी असल्याचे जाहीर केले होते. (AIMIM chief Asaduddin Owaisi on Rajnath Singh Savarkar statement)

काल एका कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी '1910 च्या दशकात अंदमानमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सावरकरांच्या दयेच्या याचिकांविषयीच्या वादाचा संदर्भ देत मंत्री म्हणाले, हा कैद्याचा अधिकार होता. गांधीजींनी त्यांना तसे करण्यास सांगितले होते. बापूंनी सावरकरांना अपीलमध्ये करण्याबद्दलही सांगितले होते. ते म्हणाले होते की, ज्या प्रकारे आपण स्वातंत्र्यासाठी शांततेने लढत आहोत, तोही तेच करेल.' असे विधान केले होते आणि यावरूनच आता त्यांना असदुद्दीन ओवैसी यांनी लक्ष केले आहे.

उदय माहूरकर आणि चिरायू पंडित लिखित वीर सावरकर - द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी राजनाथ सिंह बोलत होते. संरक्षण मंत्री असेही म्हणाले की मार्क्सवादी आणि लेनिनवादी विचारसरणीचे अनुसरण करणारे लोक सावरकरांवर फॅसिस्ट आणि हिंदुत्वाचे समर्थक असल्याचा आरोप करतात.

त्याचबरोबर सावरकरांवर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करताना, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनीही अनेक मुद्यांना हात घातला आहे स्वातंत्र्यापासून वीर सावरकरांविषयी लोकांमध्ये माहितीचा अभाव आहे. पण आता लोक या पुस्तकाद्वारे वीर सावरकरांना ओळखू शकतील. त्यानंतर स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती आणि योगी अरविंद आहेत.असे विधान या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी केलं होत. भागवत पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यापासून वीर सावरकरांना बदनाम करण्याची मोहीम चालवली जात आहे. पण आता हे पुस्तक लोकांमधील हा संभ्रम मोडून काढेल. यानंतर स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती आणि योगी अरविंद यांचा क्रमांक आहे, कारण वीर सावरकरांप्रमाणे त्यांच्याबद्दलही चुकीची माहिती पसरली आहे. जे कोणी वीर सावरकर होते, ते या तिघांच्या विचारांनी प्रभावित झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT