Goa Market  Dainik Gomantak
ब्लॉग

Ganesh Chaturthi 2023: शहरांमध्ये रानभाज्यांना पसंती; चिबूड, तवशी आणि दोडकी बाजारात दाखल

श्रावण महिन्‍यात गोव्‍यातील बहुतांश घरांमध्‍ये शाकाहारी जेवण बनविले जाते. त्‍यामुळे भाजीपाल्‍याला मोठी मागणी असते.

गोमन्तक डिजिटल टीम

संदीप देसाई

गणेश चतुर्थीचा सण जवळ आला आहे. बाजारात भाजीपाल्‍याची आवक वाढली आहे. चिबूड, तवशी, दोडगी, वाली तसेच इतर फळभाज्या, पालेभाज्या बाजारात दाखल होत असून त्यांना चांगली मागणीही आहे.

चिबूड आकाराप्रमाणे 70 ते 150 रुपये दराने विकला जातोय. तवशांना देखील आकाराप्रमाणे दर मिळतोय. इतरही भाज्यांना चांगली मागणी आहे, असे विक्रेते सांगतात.

श्रावण महिन्‍यात गोव्‍यातील बहुतांश घरांमध्‍ये शाकाहारी जेवण बनविले जाते. त्‍यामुळे भाजीपाल्‍याला मोठी मागणी असते. ग्रामीण भागात पिकविलेल्या भाज्यांसह नीरफणस, भाजीची केळी, फागला आदींना जास्‍त पसंती दिली जाते.

मध्यम आकाराचा नीरफणस 200 रुपये प्रतिनग तर भाजीचे एक केळे 20 रुपये दराने विकले जात आहे. सोबतच आंबाडे, कंदमुळे भाज्यांची मागणीही वाढली आहे.

टोमॅटोचा दर आता स्थिर झाला असून 30 रुपये प्रतिकिलो दराने तो विकला जातोय तर फलोत्पादन महामंडळाच्या गाळ्यांवर त्‍याचा भाव 19 रुपये इतका आहे. बटाटे. कांदे तसेच इतर भाज्यांचे दरही स्थिर असल्याने ग्राहक समाधान व्यक्त करत आहेत.

शहरांमध्ये रानभाज्यांना पसंती

गोव्‍याची राजधानी असलेल्‍या पणजी शहरात तायखिळा, कुड्डूक, फांगला, कोंब, नीरफणस तसेच इतर रानभाज्या विक्रीसाठी येत आहेत. त्यांना चांगली मागणीही आहे. ग्रामीण भागात रानभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे शहरांत भाज्‍यांचे दर वाढले तरी ग्रामीण भागात फारसा परिणाम जाणवत नाही. सध्‍या सर्वत्र रानभाज्या मिळत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT