savings dearness allowance hike for indian railways employees in 6th central pay commission  Danik Gomantak
अर्थविश्व-

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 14 टक्क्यांनी वाढ

रेल्वे बोर्डाने महागाई भत्त्यात केली दोनदा वाढ

दैनिक गोमन्तक

रेल्वे विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एकाचवेळी 14 टक्के वाढ केली आहे. हे असे कर्मचारी आहेत ज्यांना 6 व्या वेतन आयोगाअंतर्गत पगार मिळतो. या वेतनवाढीमुळे त्यांच्या पगारात हजारो रुपयांची वाढ होणार आहे. यासोबतच 10 महिन्यांची थकबाकीही मिळणार आहे. याबाबतचा आदेश रेल्वे बोर्डाने जारी केला आहे. (savings dearness allowance hike for indian railways employees in 6th central pay commission)

रेल्वे बोर्डाने महागाई भत्त्यात दोनदा वाढ केली आहे. त्यात म्हटले आहे की, सहाव्या वेतन आयोगांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 1 जुलै 2021 आणि 1 जानेवारी 2022 पासून वाढवण्यात आला आहे.

केव्हा किती वाढेल

सहाव्या वेतन आयोगांतर्गत पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 जुलै 2021 पासून 7 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच आता ते 189 टक्क्यांवरून 196 टक्क्यांवर पोहोचले आहे. यासोबतच, रेल्वे बोर्डाने 1 जानेवारी 2022 पासून पुन्हा महागाई भत्त्यात 7 टक्क्यांनी वाढ केली आहे. यासह ते 196 टक्क्यांवरून 203 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. रेल्वे बोर्डाच्या या निर्णयाचा रेल्वे कर्मचाऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे. वित्त संचालनालय आणि रेल्वे मंत्रालयाची मंजुरी घेतल्यानंतर रेल्वे बोर्डाने हा निर्णय लागू केला आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता

मार्चमध्ये सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती. हे लाखो कर्मचारी आहेत ज्यांना 7 व्या वेतन आयोगाखाली पगार मिळतो. सध्या या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्के आहे. त्यांचे मूळ वेतन 18 हजार रुपये आहे. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करत सरकारने मूळ किमान वेतन 7000 रुपयांवरून 18000 रुपये प्रति महिना केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Goa High Court Promotion Case: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; कायदा विभागातील 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT