5G Technology

 

Dainik gomantak

अर्थविश्व

'या' शहरांमध्ये 5G नेटवर्क होणार सुरू, दूरसंचार विभागाची घोषणा

मेट्रो आणि मोठ्या शहरांमध्ये 5G प्रथम लॉन्च होईल.

दैनिक गोमन्तक

भारतात 5G ची चाचणी गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे, मे 2022 पर्यंत देशात ही 5G चाचणी चालेल. संपूर्ण देश 5G च्या व्यावसायिक लॉन्चची वाट पाहत आहे. परंतु, अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही. आता दूरसंचार विभागाने म्हटले आहे की मेट्रो आणि मोठ्या शहरांमध्ये 5G प्रथम लॉन्च होईल.

दूरसंचार विभागाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की 5G प्रथम गुरुग्राम, बेंगळुरू, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे या मोठ्या शहरांमध्ये लाँच केले जाईल आणि हे लॉन्च चाचणीच्या आधारावर होणार नसून व्यावसायिक दृष्ट्या होणार आहे. व्होडाफोन आयडिया, जिओ आणि एअरटेल आधीच या शहरांमध्ये त्यांच्या 5G नेटवर्कची चाचणी घेत आहेत.

वृत्तानुसार, 5G साठी नवीन स्पेक्ट्रमचा लिलाव मार्च-एप्रिल 2022 मध्ये होणार आहे आणि त्यानंतर 5G नेटवर्क (Network) लाँच केले जाईल, स्पेक्ट्रमच्या किंमतीबाबत कोणतेही विधान समोर आले नाही. जर स्पेक्ट्रमची किंमत जास्त असेल तर 5G योजना देखील महाग राहील.

गेल्या दोन वर्षांत भारतीय बाजारपेठेत (Market) 100 हून अधिक 5G स्मार्टफोन (Smartphone) लॉन्च करण्यात आले आहेत. याशिवाय, इतर 5G उपकरणे देखील बाजारात आहेत. आता फक्त 5G लॉन्च होण्याची प्रतीक्षा आहे. स्मार्टफोन निर्मात्यांनी आता 4G फोन लाँच करणे जवळपास बंद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT