Reserve Bank of India Dainik Gomantak
अर्थविश्व

होम लोन घेणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! बँकेच्या 'या' चुकीवर तुम्हाला दररोज मिळतील एवढे हजार

Manish Jadhav

Reserve Bank of India: तुम्ही देखील कोणत्याही बँक किंवा NBFC कडून गृहकर्ज घेतले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. घर बांधण्यासाठी किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी कर्ज घेणे सामान्य आहे.

मात्र कर्जाची परतफेड केल्यानंतर अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये ग्राहकांना मालमत्तेची कागदपत्रे परत मिळवण्यासाठी अनेक फेऱ्या माराव्या लागल्या.

नुकतेच बँकेतून मालमत्तेची कागदपत्रे हरवल्याची घटनाही समोर आली आहे. अशीच प्रकरणे समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने नवा आदेश जारी केला आहे.

बँका आणि NBFC साठी नवीन नियम जारी केले आहेत

RBI ने बँका आणि NBFC साठी नवीन नियम जारी केले आहेत. कर्जाची पूर्ण परतफेड केल्याच्या 30 दिवसांच्या आत सर्व कागदपत्रे रिलीज करावीत, असे सेंट्रल बँकेच्या आदेशात म्हटले आहे. या कालावधीनंतर बँक किंवा NBFC द्वारे दस्तऐवज जारी केल्यास, बँकेला दंड भरावा लागेल.

दररोज 5,000 रुपये दंड

नवीन नियम 1 डिसेंबर 2023 पासून लागू होणार आहे. बँक (Bank) किंवा एनबीएफसीकडून कागदपत्रे देण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन 5 हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असे आदेशात सांगण्यात आले. दंडाची रक्कम संबंधित मालमत्ताधारकाला भरावी लागेल.

आरबीआयने असेही म्हटले होते की, जर कर्जदाराच्या मालमत्तेची कागदपत्रे हरवली तर बँकेने ग्राहकाला कागदपत्रांच्या डुप्लिकेट प्रती मिळवण्यासाठी मदत करावी लागेल. कर्जाची परतफेड केल्यानंतर जंगम मालमत्तेची कागदपत्रे बँकेने परत करणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT