Governor Shaktikant Das Dainik Gomantak
अर्थविश्व

RBI Governor Shaktikant Das on Economy: 'वाढत्या महागाईपासून मिळणार दिलासा, अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार'; RBI गव्हर्नरांचा विश्वास

RBI गव्हर्नरांनी देशाची आर्थिक वाढ आणि महागाई संदर्भात दिलासादायक बातमी दिली आहे. या बातमीने सर्वसामान्यांना लवकरच महागाईपासून दिलासा मिळू शकेल.

Manish Jadhav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. याचदरम्यान, RBI गव्हर्नरांनी देशाची आर्थिक वाढ आणि महागाई संदर्भात आनंदाची बातमी दिली आहे. या बातमीने सर्वसामान्यांना लवकरच महागाईपासून दिलासा मिळू शकेल.

खरे तर, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास अर्थव्यवस्थेची प्रगती आणि महागाई (Inflation) कमी करण्याबद्दल सकारात्मक आहेत. दोन्ही आघाड्यांवर भारत अधिक चांगली प्रगती करेल, अशी आशा आरबीआय गव्हर्नरांनी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना व्यक्त केली. दास म्हणाले की, देश योग्य दिशेने वाटचाल करत आहे, देशाचा जीडीपी देखील मजबूत स्थितीत आहे. देशाच्या ग्रामीण भागातही खपत वाढत आहे.

बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या 188 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला (एजीएम) संबोधित करताना दास म्हणाले की, भारत आपल्या विकासाच्या मार्गात मोठा बदल करण्याच्या उंबरठ्यावर आहे. भारताचा जीडीपी 8 टक्क्याने वाढत आहे. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांना मागे टाकून आपण विकासाचा हा वेग राखला आहे.

पहिल्या तिमाहीत वाढीचा दर अपेक्षेपेक्षा जास्त असेल

दास पुढे म्हणाले की, सध्या आपण मजबूत वाढीचा वेग पाहत आहोत. 2023-24 या आर्थिक वर्षातही आम्ही 8 टक्क्यांहून अधिक गती राखली. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीतही आपण अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली होती.

आता ही गती आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीतही कायम आहे. आता आरबीआयचा अंदाज आहे की, एप्रिल-जून तिमाहीत आर्थिक वाढ आपल्या स्वतःच्या अंदाजापेक्षा किंचित जास्त आहे. ग्रामीण भागातही खपत वाढत आहे.

सर्वात मोठी आर्थिक सुधारणा जीएसटी

भारतासारखा (India) मोठा देश केवळ एका क्षेत्रावर अवलंबून राहू शकत नाही. आपल्याला उत्पादन, सेवा, निर्यात आणि शेतीचा एकत्रित विकास करायचा आहे. कृषी क्षेत्रात खूप काम झाले आहे. पण, अजून बरेच काही करायचे बाकी आहे. आपल्याला सप्लाय चेन आणि व्हॅल्यू चेन फ्रेमवर्क मजबूत करावे लागेल, असेही दास यांनी नमूद केले.

स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी सुधारणा जीएसटी आहे. अनेक देशांच्या तुलनेत आपल्या देशात जीएसटी खूप स्थिर झाला आहे. जीएसटी अंतर्गत दरमहा 1.7 ट्रिलियन रुपये जमा होत आहेत. तसेच व्यवसायही सोयीचा झाला, असेही शेवटी दास यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT