Byju's Founder Byju Raveendran 
अर्थविश्व

"संस्थापक रवींद्रन फर्म चालवण्यासाठी अयोग्य," BYJU's च्या गुंतवणूकदारांकडून NCLT च्या हस्तक्षेपाची मागणी

Ashutosh Masgaunde

"Founder Ravindran unfit to run firm," BYJU's investors seek NCLT's intervention:

बायजूजच्या चार गुंतवणूकदारांनी एनसीएलटीमध्ये कंपनीविरुद्ध दडपशाही आणि गैरव्यवस्थापनाचा खटला दाखल केला आहे. तसेच संस्थापक बायजू रवींद्रन यांना एडटेक फर्म चालवण्यासाठी अयोग्य असल्याचे घोषित करण्याची मागणी केल्याचे, वृत्त पीटीआयने वृत्त दिले आहे.

BYJU's च्या व्यवस्थापनाविरुद्ध गुंतवणुकदारांच्या दाव्यात फॉरेन्सिक ऑडिट, नवीन बोर्डाची नियुक्ती आणि हक्काचा मुद्दा निरर्थक घोषित करण्याची मागणी केली आहे.

शुक्रवारी बोलावलेल्या असाधारण सर्वसाधारण सभेत (EGM) हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, रवींद्रन यांची पत्नी दिव्या गोकुलनाथ आणि त्यांचा भाऊ रिजू रवींद्रन यांनी यादरम्यान ईजीएममधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता.

यापूर्वी, कर्नाटक उच्च न्यायालयाने 21 फेब्रुवारी रोजी बायजूमध्ये 32 टक्क्यांपेक्षा जास्त स्टेक असलेल्या भागधारकांनी एकत्रितपणे बोलावलेल्या ईजीएमला स्थगिती देण्यास नकार दिला होता.

या प्रकरणी बायजूचे प्रवक्ते म्हणाले, 'बायजू रवींद्रन किंवा बोर्डाचे कोणतेही सदस्य या अवैध ईजीएमला उपस्थित राहणार नाहीत. याचा अर्थ असा की, ईजीएम बोलावल्यास आवश्यक कोरम नसेल तर अजेंड्यावर चर्चा किंवा मतदान पुढे नेले जाऊ शकत नाही.

बायजूचे संरक्षक या नात्याने, कायद्याच्या स्थापित प्रक्रियेचा आदर करणे आणि कंपनीच्या अखंडतेचे रक्षण करणे ही संस्थापकांची जबाबदारी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT