पणजी: स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत पणजीत १ डिसेंबर २०२५ पर्यंत ९२.२५ टक्के प्रकल्प पूर्ण झाले आहेत. पणजी सोडून देशातील इतर शहरात ९६ टक्के प्रकल्प पूर्ण झाले आहेत. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी कामकाज खात्याचे राज्यमंत्री तोखन साहू यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. खासदार सयानी घोष यांनी तारांकित प्रश्न विचारला होता, त्यावर साहू यांनी उत्तर दिले आहे.
पणजीसाठी स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत एकूण ५१ प्रकल्प मंजूर झाले, त्यातून ४७ प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे. सध्या चार प्रकल्पांचे काम सुरू आहे. ५१ प्रकल्पांसाठी १०५१ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पूर्ण झालेल्या ४७ प्रकल्पांसाठी १०४७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. उरलेल्या चार प्रकल्पांसाठी ३७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
या उत्तरात पुढेही म्हटले आहे की, देशभरात शंभर शहरात स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत ८ हजार ६४ प्रकल्प मंजूर झाले. त्यासाठी १.६४ लाख कोटी रुपये मंजूर झाले. त्यातील १.५५ लाख कोटी रुपयांचे ७ हजार ७४१ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर ३२३ प्रकल्पांचे काम सुरू आहे.
त्यास सरकारने ९ हजार ४२५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. स्मार्ट सिटी मिशनची मुदतवाढ ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढविण्यात आली होती. ती सर्व कामे आता डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना सर्व राज्यांना नागरी कामकाज खात्याने दिल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.