तेंबवाडा समुद्रकिनारी २६ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वा.च्या सुमारास एका सागरी कासवाने किनाऱ्यावर येत ९९ अंडी घातली. ही अंडी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवून हंगामी स्वरूपाच्या झोपडीजवळ आरक्षित क्षेत्रात जतन करून ठेवली आहेत.
मात्र, सध्या समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत असून भरतीच्या वेळी पाणी थेट या आरक्षित जागेपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे ही जागा अंड्यांसाठी असुरक्षित ठरण्याची शक्यता असून वन खात्याला ही जागा बदलण्याचा फेरविचार करावा लागणार आहे, अन्यथा भरतीच्या पाण्यामुळे अंड्यांना धोका संभवू शकतो. यंदा प्रथमच सरकारने आरक्षित केलेल्या सुमारे ५०० चौरस मीटर क्षेत्रापर्यंत समुद्राचे पाणी पोहोचू लागले आहे, ही बाब चिंताजनक मानली जात आहे. तेंबवाडा समुद्रकिनारी १९९७ सालापासून सागरी कासव संवर्धन मोहीम राबवली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.