राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुरते जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजधानी पणजीसह राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालीये. मडगावात तर रस्त्यांना नद्यांचे स्वरुप प्राप्त झाले आहे. रस्त्यांवरुन वाट काढताना लोकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. यातच, शिक्षक विवेक नाईक यांनी राज्यातील पूरस्थितीवर भाष्य केले. नाईक म्हणाले की, दरवर्षी पावसाळ्यात गोव्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. राज्यकर्ते दरवर्षी याकडे दुर्लक्ष करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.