GST revised rates: सर्वसामान्यांना महागाईतून मोठा दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने जीएसटीच्या दरात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता देशभरात ४ आणि ५% तसेच १२ आणि १८% असे चार स्लॅब नसून, फक्त २ स्लॅब असतील. जीएसटी परिषदेच्या ५६व्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ३ सप्टेंबर रोजी ही माहिती जाहीर केली.
सरकारने जीएसटीमध्ये मोठा बदल करत आता फक्त दोनच स्लॅब ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे साबण, शॅम्पू, एसी आणि कार यांसारख्या अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून, म्हणजेच २२ सप्टेंबरपासून हे नवीन नियम लागू होतील. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना महागाईपासून मोठा दिलासा मिळणार असून, लक्झरी वस्तूंवर मात्र जास्त कर आकारला जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.