गोव्याचा ऐतिहासिक वारसा असलेल्या पारंपारिक मिठागरांचे (Salt Pans) संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. 'मिठागर संवर्धन, साहाय्य आणि पुनरुज्जीवन' योजनेअंतर्गत सरकारने ९५ लाख रुपयांच्या विशेष निधीला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे लुप्त होत चाललेल्या मिठागर व्यवसायाला आणि त्यावर अवलंबून असलेल्या शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पर्यावरण संचालक सचिन देसाई यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण निधीपैकी ७५ लाख रुपयांचा सिंहाचा वाटा थेट पारंपारिक मिठागर व्यावसायिकांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या योजनेंतर्गत राज्यातील ७५ मिठागर शेतकर्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे वार्षिक आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. गेल्या काही वर्षांत मजुरांची कमतरता आणि नैसर्गिक बदलांमुळे मिठाचे उत्पादन घटत चालले होते, मात्र या आर्थिक मदतीमुळे शेतकर्यांना ही परंपरा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.