राज्यात मुसळधार पावसानं पुन्हा एकदा जोर धरला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तिराळ-उसगाव येथील संदीप व प्रदीप नाईक यांच्या घराची भिंत पूर्णपणे कोसळली. जोरदार पावसामुळे भिंतीला भगदाड पडले आणि अखेर ती जमीनदोस्त झाली.
या घरात संदीप आणि प्रदीप नाईक हे दोघे वास्तव्यास आहेत. मात्र, घटना घडली त्या वेळी ते दोघेही घरात नसल्याने मोठा अनर्थ टळला. पावसामुळे आधीच भिंतीला तडे गेले होते आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास भिंत पूर्णपणे ढासळली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने पाहणी केली. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली असून, नाईक कुटुंबीयांच्या घराची त्वरित दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.