''समुद्रात नौदल आहे म्हणून गोवा सुरक्षित नाहीतर...." मुख्यमंत्र्यांनी सांगितली पाकिस्तानच्या हल्ल्याची गंभीरता

Indian coastal defense: पाकिस्तानने भारतावर हल्ला करत ९०० हून अधिक ड्रोन पाठवले, जर नौदल किनारी सीमेवर उपस्थित नसते तर ते गोव्यातही पोहोचू शकले असते

पणजी: गोवा हे एक किनारी राज्य आहे. आपण सीमेपेक्षा खूप दूर आहोत, पाकिस्तान हल्ल्याचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही असं समजून वावरत असलेल्या प्रत्येकाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भारतीय नौदलाचे महत्व पटवून दिले आहे. पाकिस्तानने भारतावर हल्ला करत ९०० हून अधिक ड्रोन पाठवले, जर नौदल किनारी सीमेवर उपस्थित नसते तर ते गोव्यातही पोहोचू शकले असते. भारतीय नौदल समुद्रात गस्त घालत आहेत म्हणूनच आपण गोव्यात सुरक्षित आहोत असं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले आहेत.

यासोबतच त्यांनी आमदार राजेश फळदेसाई यांनी भाजपमध्ये सामील होऊन चांगला निर्णय घेतला असं म्हणत त्यांचं कौतुक केलं आहे. "त्यांनी मला सांगितलं की त्यांना फक्त लोकांसाठी काम करायचं आहे आणि त्यांना कोणतेही मंत्रिपद नको आहे. यावरून असं दिसून येतं की काम करू इच्छिणारा माणूस भाजपमध्ये सामील होतो."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com