पणजी: गोवा सरकारने 'अक्षयपात्र' या संस्थेला राज्यात आणल्यामुळे, राज्यातील महिला स्वयंसेवी गटांवर अन्याय होत असल्याचा आरोप विरोधकांनी विधानसभेत केला आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी महिलांना स्वावलंबी करण्यासाठी सुरू केलेल्या योजनेवर सरकार अन्याय करत असल्याचं विधान गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केले आहे.
या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. स्थानिक महिला बचत गट दर्जेदार माध्यान्ह आहार पुरवूनही मुख्यमंत्री अक्षयपात्रचे समर्थन का करत आहेत हा सवाल सरदेसाई यांनी केला.
विजय सरदेसाई यांनी काही दिवसांपूर्वी रवींद्र केळेकर ज्ञानमंदिर शाळेला भेट देऊन स्थानिक बचत गटाकडून दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह आहाराचा दर्जा तपासला. त्यावेळी त्यांनी विधानसभेच्या अधिवेशनात मी हा मुद्दा उपस्थित करेन आणि मुख्यमंत्र्यांना याविषयी विचारणार आहे, असे सरदेसाईंनी सांगितले होते. याच मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.